शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
4
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
5
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
6
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
7
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
8
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
9
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
10
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
11
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
12
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
13
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
14
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
15
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
16
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
17
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
18
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
19
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
20
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:55 IST

नक्षलग्रस्त भागातील मतदार नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी मतदान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वीच्या एक दोन निवडणुकीत होते. मात्र गुरूवारी (दि.११) लोकसभा निवडणुकी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली.

ठळक मुद्देकडेकोट बंदोबस्त : मतदारांमध्ये उत्साह, पोलीस प्रशासनाची मेहनत फळाला, भीती झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलग्रस्त भागातील मतदार नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी मतदान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वीच्या एक दोन निवडणुकीत होते. मात्र गुरूवारी (दि.११) लोकसभा निवडणुकी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी या मतदारसंघाचा गडचिरोली चिमूर मतदारसंघात समावेश आहे. या मतदार संघात एकूण २६ संवेदनशिल मतदान केंद्राचा समावेश आहे. तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात सुध्दा पाच ते सहा संवेदनशिल मतदान केंद्र आहे.त्यामुळेच या भागात सकाळी ७ वाजता ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान घेण्यात आले. संवेदनशिल मतदान केंद्रामध्ये पिपरीया, दरेकसा, बिजेपार व पिपरीया,रामाटोला, हलबीटोला, गल्लाटोला, बाकलसर्रा, जांभळी, नवाटोला, धनेगाव, दरेकसा, जमाकुडो, वंजारी, टोयागोंदी, चांदसूरज, विचारपूर, कोपालगड, कोसमतर्रा, मानागड, मरकाखांदा, कुलरभट्टी, बिजेपार, पांढरवानी, डोमाटोला, लभाधरणी, गोर्रे, लोहारा, भर्रीटोला या केंद्राचा समावेश आहे.देवरी तालुक्यातील घोनाडी, मंगेझरी, बीजटोला, सर्रेगाव, म्हैसुली ही मतदान केंद्र नक्षलग्रस्त भागात असल्याने गेल्या निवडणुकीत या गावातील नागरिक मतदान करण्यासाठी पुढे आले नव्हते. त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवून सुध्दा नागरिकांमध्ये भीती कायम होती. मात्र यावेळेच्या निवडणुकीत याचा पूर्णपणे अभाव दिसून येत होता. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.विशेष म्हणजे प्रथमच या भागातील मतदार स्वत:हून मतदानासाठी निर्भीडपणे पुढे येते होते. त्यामुळे सकाळी ११ वाजतापर्यंत भागातील मतदान केंद्रावर ३५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे हळूहळू का होईना नक्षलग्रस्त भागातील मतदारांमध्ये नक्षलवाद्यांप्रती भीती कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्णनक्षलग्रस्त भागातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा गावांमध्ये पोलीस विभागातर्फे मागील तीन महिन्यांपासून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच गावागावात जाऊन पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करुन व त्यांच्यातील नक्षलवाद्यांची भीती दूर केली. त्यामुळेच यंदा मतदान करण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येते होते.त्यामुळे या निवडणुकीत पोलीस विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण दिसून आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019