शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
4
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
5
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
6
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
7
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी
8
दिवाळीत आपलं कुटुंब ठेवा सुरक्षित! फक्त ५ रुपयांत ५०,००० चा विमा; या कंपनीने आणला 'फटाका इन्शुरन्स'
9
‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
10
Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
11
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
12
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
13
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
14
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
15
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
16
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
17
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
18
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
19
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
20
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका

नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:55 IST

नक्षलग्रस्त भागातील मतदार नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी मतदान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वीच्या एक दोन निवडणुकीत होते. मात्र गुरूवारी (दि.११) लोकसभा निवडणुकी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली.

ठळक मुद्देकडेकोट बंदोबस्त : मतदारांमध्ये उत्साह, पोलीस प्रशासनाची मेहनत फळाला, भीती झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलग्रस्त भागातील मतदार नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी मतदान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वीच्या एक दोन निवडणुकीत होते. मात्र गुरूवारी (दि.११) लोकसभा निवडणुकी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी या मतदारसंघाचा गडचिरोली चिमूर मतदारसंघात समावेश आहे. या मतदार संघात एकूण २६ संवेदनशिल मतदान केंद्राचा समावेश आहे. तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात सुध्दा पाच ते सहा संवेदनशिल मतदान केंद्र आहे.त्यामुळेच या भागात सकाळी ७ वाजता ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान घेण्यात आले. संवेदनशिल मतदान केंद्रामध्ये पिपरीया, दरेकसा, बिजेपार व पिपरीया,रामाटोला, हलबीटोला, गल्लाटोला, बाकलसर्रा, जांभळी, नवाटोला, धनेगाव, दरेकसा, जमाकुडो, वंजारी, टोयागोंदी, चांदसूरज, विचारपूर, कोपालगड, कोसमतर्रा, मानागड, मरकाखांदा, कुलरभट्टी, बिजेपार, पांढरवानी, डोमाटोला, लभाधरणी, गोर्रे, लोहारा, भर्रीटोला या केंद्राचा समावेश आहे.देवरी तालुक्यातील घोनाडी, मंगेझरी, बीजटोला, सर्रेगाव, म्हैसुली ही मतदान केंद्र नक्षलग्रस्त भागात असल्याने गेल्या निवडणुकीत या गावातील नागरिक मतदान करण्यासाठी पुढे आले नव्हते. त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवून सुध्दा नागरिकांमध्ये भीती कायम होती. मात्र यावेळेच्या निवडणुकीत याचा पूर्णपणे अभाव दिसून येत होता. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.विशेष म्हणजे प्रथमच या भागातील मतदार स्वत:हून मतदानासाठी निर्भीडपणे पुढे येते होते. त्यामुळे सकाळी ११ वाजतापर्यंत भागातील मतदान केंद्रावर ३५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे हळूहळू का होईना नक्षलग्रस्त भागातील मतदारांमध्ये नक्षलवाद्यांप्रती भीती कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्णनक्षलग्रस्त भागातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा गावांमध्ये पोलीस विभागातर्फे मागील तीन महिन्यांपासून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच गावागावात जाऊन पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करुन व त्यांच्यातील नक्षलवाद्यांची भीती दूर केली. त्यामुळेच यंदा मतदान करण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येते होते.त्यामुळे या निवडणुकीत पोलीस विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण दिसून आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019