शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यापोटी भरले १६ कोटी अन्‌ परतावा मिळाला केवळ ६२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाचा विमा काढला होता. विमा हप्त्याच्या शेतकरी आणि शासनाने १६ ...

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाचा विमा काढला होता. विमा हप्त्याच्या शेतकरी आणि शासनाने १६ कोटी ४० रुपये विमा कंपन्यांकडे भरले. खरीप हंगामात धान पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरवीत केवळ ६२ लाख रुपये ३३ हजार रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. त्यामुळे विमा कंपन्या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे बिकट चित्र आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरून पिकांचा विमा काढतात. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासूनचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनुभव पाहता विमा कंपन्या या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ५६६४० शेतकऱ्यांनी २८९१५.५ हेक्टरमधील पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा उतरविला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी २ कोटी २० लाख रुपये, राज्य आणि केंद्र सरकारने १४ कोटी २८ लाख, असे एकूण १६ कोटी ४८ लाख रुपये विमा कंपनीकडे भरले. खरीप हंगामात परतीचा पाऊस आणि कीड रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी याची माहिती वेळेत विमा कंपन्यांना दिली. त्यांनी पंचनामे सुद्धा केले; पण मदतीसाठी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना पात्र ठरवीत नुकसानभरपाईपोटी केवळ ६२ लाख ३३ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यामुळे १६ कोटी रुपये विमा कंपन्यांच्याच घशात गेल्याचे चित्र आहे.

............

काढणीपश्चात नुकसानीसाठी केवळ ५१ शेतकरी पात्र

गेल्या खरीप हंगामात धान कापणीच्या कालावधीत परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हजारो हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने केवळ काढणीपश्चात पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५१ शेतकऱ्यांना पात्र ठरविले. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान होऊनदेखील मदत मिळण्यापासून वंचित राहिले.

......

केवळ दोनच तालुक्यांतील शेतकऱ्यांना भरपाई

मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असला तरी विमा कंपनीने केवळ गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ४३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविले. उर्वरित शेतकऱ्यांना कुठल्या आधारावर अपात्र ठरविण्यात आले, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

.........

म्हणून पीक विम्याबाबत उदासीनता

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन आणि पिकांचा विमा काढल्यानंतरही नुकसानभरपाई मिळत नसल्याने दिवसेंदिवस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. मागील चार वर्षांत दीड लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आता ५० हजारांवर आली आहे. हे सगळे फलित विमा कंपन्यांच्या धोरणाचेच आहे.

..........

जिल्ह्यातील एकूण पीक विमाधारक शेतकरी : ५६६४०

विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम : २ कोटी २० लाख

केंद्र आणि राज्य सरकारने उचललेला वाटा : १४ कोटी २८ लाख

नुकसानभरपाईला पात्र ठरलेले शेतकरी : ४३३३

शेतकऱ्यांना मिळालेला एकूण परतावा : ६२.३३ लाख रुपये

.................