शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

पीक विम्यापोटी भरले १६ कोटी अन्‌ परतावा मिळाला केवळ ६२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाचा विमा काढला होता. विमा हप्त्याच्या शेतकरी आणि शासनाने १६ ...

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाचा विमा काढला होता. विमा हप्त्याच्या शेतकरी आणि शासनाने १६ कोटी ४० रुपये विमा कंपन्यांकडे भरले. खरीप हंगामात धान पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरवीत केवळ ६२ लाख रुपये ३३ हजार रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. त्यामुळे विमा कंपन्या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे बिकट चित्र आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरून पिकांचा विमा काढतात. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासूनचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनुभव पाहता विमा कंपन्या या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ५६६४० शेतकऱ्यांनी २८९१५.५ हेक्टरमधील पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा उतरविला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी २ कोटी २० लाख रुपये, राज्य आणि केंद्र सरकारने १४ कोटी २८ लाख, असे एकूण १६ कोटी ४८ लाख रुपये विमा कंपनीकडे भरले. खरीप हंगामात परतीचा पाऊस आणि कीड रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी याची माहिती वेळेत विमा कंपन्यांना दिली. त्यांनी पंचनामे सुद्धा केले; पण मदतीसाठी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना पात्र ठरवीत नुकसानभरपाईपोटी केवळ ६२ लाख ३३ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यामुळे १६ कोटी रुपये विमा कंपन्यांच्याच घशात गेल्याचे चित्र आहे.

............

काढणीपश्चात नुकसानीसाठी केवळ ५१ शेतकरी पात्र

गेल्या खरीप हंगामात धान कापणीच्या कालावधीत परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हजारो हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने केवळ काढणीपश्चात पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५१ शेतकऱ्यांना पात्र ठरविले. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान होऊनदेखील मदत मिळण्यापासून वंचित राहिले.

......

केवळ दोनच तालुक्यांतील शेतकऱ्यांना भरपाई

मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असला तरी विमा कंपनीने केवळ गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ४३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविले. उर्वरित शेतकऱ्यांना कुठल्या आधारावर अपात्र ठरविण्यात आले, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

.........

म्हणून पीक विम्याबाबत उदासीनता

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन आणि पिकांचा विमा काढल्यानंतरही नुकसानभरपाई मिळत नसल्याने दिवसेंदिवस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. मागील चार वर्षांत दीड लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आता ५० हजारांवर आली आहे. हे सगळे फलित विमा कंपन्यांच्या धोरणाचेच आहे.

..........

जिल्ह्यातील एकूण पीक विमाधारक शेतकरी : ५६६४०

विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम : २ कोटी २० लाख

केंद्र आणि राज्य सरकारने उचललेला वाटा : १४ कोटी २८ लाख

नुकसानभरपाईला पात्र ठरलेले शेतकरी : ४३३३

शेतकऱ्यांना मिळालेला एकूण परतावा : ६२.३३ लाख रुपये

.................