शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पीक विम्यापोटी भरले १६ कोटी अन्‌ परतावा मिळाला केवळ ६२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाचा विमा काढला होता. विमा हप्त्याच्या शेतकरी आणि शासनाने १६ ...

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाचा विमा काढला होता. विमा हप्त्याच्या शेतकरी आणि शासनाने १६ कोटी ४० रुपये विमा कंपन्यांकडे भरले. खरीप हंगामात धान पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरवीत केवळ ६२ लाख रुपये ३३ हजार रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. त्यामुळे विमा कंपन्या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे बिकट चित्र आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरून पिकांचा विमा काढतात. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासूनचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनुभव पाहता विमा कंपन्या या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ५६६४० शेतकऱ्यांनी २८९१५.५ हेक्टरमधील पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा उतरविला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी २ कोटी २० लाख रुपये, राज्य आणि केंद्र सरकारने १४ कोटी २८ लाख, असे एकूण १६ कोटी ४८ लाख रुपये विमा कंपनीकडे भरले. खरीप हंगामात परतीचा पाऊस आणि कीड रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी याची माहिती वेळेत विमा कंपन्यांना दिली. त्यांनी पंचनामे सुद्धा केले; पण मदतीसाठी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना पात्र ठरवीत नुकसानभरपाईपोटी केवळ ६२ लाख ३३ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यामुळे १६ कोटी रुपये विमा कंपन्यांच्याच घशात गेल्याचे चित्र आहे.

............

काढणीपश्चात नुकसानीसाठी केवळ ५१ शेतकरी पात्र

गेल्या खरीप हंगामात धान कापणीच्या कालावधीत परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हजारो हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने केवळ काढणीपश्चात पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५१ शेतकऱ्यांना पात्र ठरविले. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान होऊनदेखील मदत मिळण्यापासून वंचित राहिले.

......

केवळ दोनच तालुक्यांतील शेतकऱ्यांना भरपाई

मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असला तरी विमा कंपनीने केवळ गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ४३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविले. उर्वरित शेतकऱ्यांना कुठल्या आधारावर अपात्र ठरविण्यात आले, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

.........

म्हणून पीक विम्याबाबत उदासीनता

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन आणि पिकांचा विमा काढल्यानंतरही नुकसानभरपाई मिळत नसल्याने दिवसेंदिवस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. मागील चार वर्षांत दीड लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आता ५० हजारांवर आली आहे. हे सगळे फलित विमा कंपन्यांच्या धोरणाचेच आहे.

..........

जिल्ह्यातील एकूण पीक विमाधारक शेतकरी : ५६६४०

विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम : २ कोटी २० लाख

केंद्र आणि राज्य सरकारने उचललेला वाटा : १४ कोटी २८ लाख

नुकसानभरपाईला पात्र ठरलेले शेतकरी : ४३३३

शेतकऱ्यांना मिळालेला एकूण परतावा : ६२.३३ लाख रुपये

.................