शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यापोटी भरले १६ कोटी अन्‌ परतावा मिळाला केवळ ६२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाचा विमा काढला होता. विमा हप्त्याच्या शेतकरी आणि शासनाने १६ ...

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाचा विमा काढला होता. विमा हप्त्याच्या शेतकरी आणि शासनाने १६ कोटी ४० रुपये विमा कंपन्यांकडे भरले. खरीप हंगामात धान पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरवीत केवळ ६२ लाख रुपये ३३ हजार रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. त्यामुळे विमा कंपन्या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे बिकट चित्र आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरून पिकांचा विमा काढतात. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासूनचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनुभव पाहता विमा कंपन्या या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ५६६४० शेतकऱ्यांनी २८९१५.५ हेक्टरमधील पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा उतरविला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी २ कोटी २० लाख रुपये, राज्य आणि केंद्र सरकारने १४ कोटी २८ लाख, असे एकूण १६ कोटी ४८ लाख रुपये विमा कंपनीकडे भरले. खरीप हंगामात परतीचा पाऊस आणि कीड रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी याची माहिती वेळेत विमा कंपन्यांना दिली. त्यांनी पंचनामे सुद्धा केले; पण मदतीसाठी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना पात्र ठरवीत नुकसानभरपाईपोटी केवळ ६२ लाख ३३ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यामुळे १६ कोटी रुपये विमा कंपन्यांच्याच घशात गेल्याचे चित्र आहे.

............

काढणीपश्चात नुकसानीसाठी केवळ ५१ शेतकरी पात्र

गेल्या खरीप हंगामात धान कापणीच्या कालावधीत परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हजारो हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने केवळ काढणीपश्चात पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५१ शेतकऱ्यांना पात्र ठरविले. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान होऊनदेखील मदत मिळण्यापासून वंचित राहिले.

......

केवळ दोनच तालुक्यांतील शेतकऱ्यांना भरपाई

मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असला तरी विमा कंपनीने केवळ गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ४३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविले. उर्वरित शेतकऱ्यांना कुठल्या आधारावर अपात्र ठरविण्यात आले, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

.........

म्हणून पीक विम्याबाबत उदासीनता

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन आणि पिकांचा विमा काढल्यानंतरही नुकसानभरपाई मिळत नसल्याने दिवसेंदिवस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. मागील चार वर्षांत दीड लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आता ५० हजारांवर आली आहे. हे सगळे फलित विमा कंपन्यांच्या धोरणाचेच आहे.

..........

जिल्ह्यातील एकूण पीक विमाधारक शेतकरी : ५६६४०

विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम : २ कोटी २० लाख

केंद्र आणि राज्य सरकारने उचललेला वाटा : १४ कोटी २८ लाख

नुकसानभरपाईला पात्र ठरलेले शेतकरी : ४३३३

शेतकऱ्यांना मिळालेला एकूण परतावा : ६२.३३ लाख रुपये

.................