शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आदिवासी सोसायटीत धान टाकणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST

गोंदिया : मे महिना संपत असताना शेतकऱ्यांचे रब्बीतील धान सरकारने खरेदी करण्यासाठी धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे ...

गोंदिया : मे महिना संपत असताना शेतकऱ्यांचे रब्बीतील धान सरकारने खरेदी करण्यासाठी धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नवेगावबांधच्या आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात गुरुवारी (दि.२०) धान नेऊन त्याचे ढिगार टाकले. जेव्हापर्यंत आमचे धान खरेदी करत नाही तेव्हापर्यंत हे धान त्याच ठिकाणी राहू द्या, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. परंतु, आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर नवेगावबांध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतकऱ्यांनी आपला हक्क मागण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात आपले धान नेऊन टाकले. मे महिन्याचा शेवट होत असतानाही सरकारने धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी २० मे रोजी सकाळी ११.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत नवेगावबांध येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात धान टाकले होते. नवेगावबांध येथील पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांच्या तक्रारीवरून शेतकऱ्यांवर भादंविच्या कलम १४३, १४५, १४९, १५१, १८८, २६९, २७०, २९१ सहकलम ३७ (३), १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम ५१ (ब), सहकलम २, ३, ४, साथरोग प्रति अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक हेगडकर करीत आहेत.