शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शौचालय बांधकामात भ्रष्टाचार

By admin | Updated: November 28, 2015 02:57 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत अत्री ग्रामपंचायतला निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. पण माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार,

अत्री येथील प्रकार : सरपंच व ग्रामसेवकावर आरोप, लहान मुलाच्या नावे काढले देयकपरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत अत्री ग्रामपंचायतला निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. पण माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे. यात सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक सविता पारधी दोषी असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी उपसरपंच टोईराम बिसेन यांनी वरिष्ठांकडे केली आहे.निर्मल योजनेत १२४ कुटुंबांना लाभ देण्यात आले होते. मात्र बीपीएल, अनुसूचित जाती-६, एपीएल ६, एपीसी, विधवा महिला प्रमुख ५, एपीसी भूमिहिन १०, एपीएल अल्पभुधारक शेतकरी ४१, बीपीएल अन्य ५६ लाभार्थी यांना लाभ सन २००६-०७ मध्ये देण्यात आला. शासन निर्णयानुसार ज्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले त्यांना दुसऱ्यांना देत येत नाही, असे निर्देश आहेत. मात्र ग्रामसेवक सविता पारधी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंब संख्या दाखवून त्यांनाच दाखविण्यात आले. गरजू व पात्र गरीब लाभार्थ्यांना डच्चू देण्यात आला. गावात २३ शौचालय मंजूर करण्यात आले. मात्र जिवंत असून व घटस्फोट झाले नसून त्यांना विधवा म्हणून दाखवून व शाळेत शिकणारी लहान मुलगी वेगळे राहत असल्याचे सांगून त्यांना लाभ देण्यात आला आहे. पात्र नसतानाही पात्र असल्याचे सांगितले आहे. प्रमिला गेंदलाल बागडे किडंगीपार येथे राहत असून वडिलाचे नाव देऊन व पतीचे नाव कापून लाभ देण्यात आला. गोपीचंद तोलन पारधी बाहेरगावी राहत असून त्यांनाही लाभ देण्यात आला. रिक्की रेखलाल मौजे, महेंद्र हिरामन येसने, अतुल प्रल्हाद माहुरे, विनोद योगराज उरकुडे, रविंद्र निखाडे, देवेंद्र उरकुडे, मंगेश पटले, राजेश उरकुडे, धमेंद्र उरकुडे, निकेश रहांगडाले, रामप्रसाद माहुरे, अश्विन गजबे, विलास वरडी, होलीचंद बिसेन लहान मुले असून यांना लाभ देण्यात आला आहे. ढोमनाथ रिनाईत यांना मुलगा नसून मुलगा सांगून हितेंद्र या नावाने लाभ देण्यात आला. यात कित्येक नावात फेरबदल करण्यात आले. मात्र १२ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. यात लाभार्थ्यांनी स्वत: बांधकाम न करता ग्रामपंचायतीने कंत्राटदाराशी साठगाठ करुन कमिशन घेऊन काम केले. तेही निकृष्ठ दर्जाचे तयार करण्यात आले. या सर्व प्रकरणाची तक्रार ग्रा.पं. चे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते टोईराम बिसेन यांनी बीडीओ, सीओ, जिल्हाधिकारी, आयुक्त, आमदार यांच्याकडे केली आहे. आता काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित सरपंच, तत्कालीन ग्रामसेवकावर योग्य कारवाही करुन निलंबित करण्याची मागणी केली आहे. ग्रामसेविका सविता पारधी यांची बदली गोंदिया तालुक्यातील गर्रा येथे झाली असून कार्यरत ग्रामसेवक धुर्वे यांनी सांगितले की त्याअगोदर बोदा येथील पटले ग्रामसेवक यांनी पदभार सांभाळला. मला नंतर देण्यात आला. सर्व सर्व्हेक्षण सविता पारधी यांनी केले व काही लाभार्थ्यांना देयकही पारधी व पटले यांनी दिले. (वार्ताहर)