शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कोरोनाचा आठवडा बाजारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:27 IST

अर्जुनी मोरगाव : मागील महिन्यापासून काेरोना संसर्गाचा उद्रेक पुन्हा सुरु झाला आहे. त्यातच आता संसर्गाची आकडेवारी १००च्या वर येत ...

अर्जुनी मोरगाव : मागील महिन्यापासून काेरोना संसर्गाचा उद्रेक पुन्हा सुरु झाला आहे. त्यातच आता संसर्गाची आकडेवारी १००च्या वर येत आहे. यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आता ग्रामीण भागातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्गाचा फटका आठवडा बाजारांना बसला आहे. येत्या १५ मेपर्यंत आठवडा बाजार बंद ठेवण्यात यावेत, असे निर्देश अनेक ग्रामपंचायतींच्यावतीने देण्यात आले आहेत.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, सडक-अर्जुनी नगर पंचायत क्षेत्रातील आठवडा बाजार, गोंदिया तालुक्यातील एकोडी अशा विविध ग्रामपंचायतींनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व आस्थापना, दुकाने, भाजीपाला विक्रेते आदींनी नियमांचे पालन करावे, तसेच आठवडा बाजार १५ मेपर्यंत बंद ठेवावे, असे आदेश काढले आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील संसर्गाची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. त्यातच ग्रामीण भागातही संसर्गाचा शिरकाव होत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आठवडा बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीच्या माध्यमातून संसर्ग वाढण्याची भीती आहे.