शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

कोरोना केवळ शहरातील शाळांतून पसरतोय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. ऑनलाइनवर या शाळांची मदार सुरू होती; मात्र मागील दोन महिन्यांपासून ...

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. ऑनलाइनवर या शाळांची मदार सुरू होती; मात्र मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला. गोंदिया जिल्हादेखील कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करीत सर्व व्यवहार सुरळीत केले; मात्र शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. तर ग्रामीण भागात शालेय व्यवस्थापन आणि ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश असले तरी पाचव्या वर्गापासून शाळा भरत असल्याचे चित्र आहे. दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकसुद्धा त्रस्त झाले आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार असून, ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडे यासंदर्भात चौकशी करीत आहेत; पण शासन स्तरावर यासंदर्भात कुठलाच निर्णय झाला नसल्याने त्यांचीदेखील अडचण झाली आहे. ग्रामीण भागातील शाळा महिनाभरापासून सुरळीत असून, एकही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ऐकिवात नाही. मग शहरातील भागातील शाळा सुरू करण्यास नेमकी अडचण काय, असा सवाल पालक आणि काही शाळांकडूनदेखील उपस्थित केला जात आहे.

.......

शहराकडून ग्रामीण भागाकडे

शहरी भागातील शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. त्यातच ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील काही खासगी शाळांनी तुकड्या टिकविण्यासाठी आता शहरी भागातील विद्यार्थ्यांना टार्गेट केले आहे. शहरातील नगर परिषदेच्या शाळांमधून टीसी काढण्यासाठी पालक दररोज येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर समस्या निर्माण झाली आहे.

.............

जिल्ह्यात १६३० शाळा

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०६९, अनुदानीत ३४०, विनाअनुदानीत २६० इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा असून, यात अडीच लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने ऑनलाइनवर या शाळांचा कारभार सुरू आहे.

.................

ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले

मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेचे दर्शन झाले नाही. बहुतेक विद्यार्थी घराबाहेरसुद्धा पडले नाहीत. तर चार ते पाच तास मोबाइलवर ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. याचा आता विद्यार्थ्यांनासुद्धा कंटाळा आला आहे. तर पालकांनासुद्धा त्यांच्या पाल्यांची चिंता हाेऊ लागली आहे.