शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

वर्षभरात सहा कोटींच्या सिमेंट नाल्यांचे बांधकाम

By admin | Updated: May 23, 2015 01:42 IST

शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कोट्यवधी रूपयांच्या योजना दरवर्षी राबविते. शेतजमिनीचा कस उत्तम रहावा, ....

गोंदिया : शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कोट्यवधी रूपयांच्या योजना दरवर्षी राबविते. शेतजमिनीचा कस उत्तम रहावा, पिकांसाठी वेळेवर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी माती नाला बांध, सिमेंट नाला बांध व शेततळे आदी कोट्यवधी रूपये खर्चून कामे केली जातात. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांत जिल्हाभरात एकूण ८३ सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी सहा कोटी चार लाख नऊ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम व एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम सन २०१४-१५ मध्ये जिल्हाभरात कोट्यवधी रूपयांची कामे करण्यात आलीत. जिल्हाभरात भात खाचरे दुरूस्ती व मजगीचे काम ४१२५.९३ हेक्टरे क्षेत्रात करण्यात आले. त्यासाठी १२१९.१२ लाख रूपयांचा खर्च आला. बोडी खोलीकरणाची १३ कामे करण्यात आली. त्यासाठी ७.३१ लाख रूपये खर्च करण्यात आले. नाला खोलीकरणची १५ कामे करण्यात आली. त्यासाठी ५८.२० लाख रूपयांचा खर्च आला. जिल्हाभरात ४४ शेततळे तयार करण्यात आले. त्यासाठी ५०.५९ लाख रूपये खर्च करण्यात आले. तर माती नाला बांधकाम केवळ चार करण्यात आले. त्यासाठी २९.५६ लाखांचा खर्च आला आहे. ही सर्व कामे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात करण्यात आले आहेत.एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून जिल्हाभरात वर्षभरात एकूण ८३ सिमेंट नाला बांधकाम करण्यात आले. त्यासाठी तब्बल ६०४.०९ लाख रूपयांचा खर्च आल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे. ही सर्व कामे थेट कंत्राटदारामार्फत न करता निविदेच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही कृषी विभागाने सांगितले आहे. सिमेंट नाला बांधकामामुळे पाणी अडविले जाते. त्यामुळे सभोवारची शेतजमीन सुपीक होण्यास मदत होते. शेतकऱ्यांच्या पिकांना हवे त्यावेळी त्याद्वारे पाणी पुरविण्याचे कार्य होत असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व सडक-अर्जुनी ही दोन तालुके वगळता सर्वच तालुक्यांमध्ये सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. याचा कितपत लाभ शेतकऱ्यांना होईल, हे पुढील हंगामातील उत्पन्नानुसार कळणार आहे. शिवाय बांधकामाबाबत कृषी विभागाला उद्दिष्ट देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. शासन शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून विविध कृषी योजनांवर कोट्यवधी रूपये खर्च करते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्या नेहमीच ‘जैसे थे’ असतात. त्यामुळे या योजनांचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हा संशोधनाचा विषय ठरत आहे. (प्रतिनिधी)