शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात सहा कोटींच्या सिमेंट नाल्यांचे बांधकाम

By admin | Updated: May 23, 2015 01:42 IST

शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कोट्यवधी रूपयांच्या योजना दरवर्षी राबविते. शेतजमिनीचा कस उत्तम रहावा, ....

गोंदिया : शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कोट्यवधी रूपयांच्या योजना दरवर्षी राबविते. शेतजमिनीचा कस उत्तम रहावा, पिकांसाठी वेळेवर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी माती नाला बांध, सिमेंट नाला बांध व शेततळे आदी कोट्यवधी रूपये खर्चून कामे केली जातात. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांत जिल्हाभरात एकूण ८३ सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी सहा कोटी चार लाख नऊ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम व एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम सन २०१४-१५ मध्ये जिल्हाभरात कोट्यवधी रूपयांची कामे करण्यात आलीत. जिल्हाभरात भात खाचरे दुरूस्ती व मजगीचे काम ४१२५.९३ हेक्टरे क्षेत्रात करण्यात आले. त्यासाठी १२१९.१२ लाख रूपयांचा खर्च आला. बोडी खोलीकरणाची १३ कामे करण्यात आली. त्यासाठी ७.३१ लाख रूपये खर्च करण्यात आले. नाला खोलीकरणची १५ कामे करण्यात आली. त्यासाठी ५८.२० लाख रूपयांचा खर्च आला. जिल्हाभरात ४४ शेततळे तयार करण्यात आले. त्यासाठी ५०.५९ लाख रूपये खर्च करण्यात आले. तर माती नाला बांधकाम केवळ चार करण्यात आले. त्यासाठी २९.५६ लाखांचा खर्च आला आहे. ही सर्व कामे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात करण्यात आले आहेत.एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून जिल्हाभरात वर्षभरात एकूण ८३ सिमेंट नाला बांधकाम करण्यात आले. त्यासाठी तब्बल ६०४.०९ लाख रूपयांचा खर्च आल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे. ही सर्व कामे थेट कंत्राटदारामार्फत न करता निविदेच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही कृषी विभागाने सांगितले आहे. सिमेंट नाला बांधकामामुळे पाणी अडविले जाते. त्यामुळे सभोवारची शेतजमीन सुपीक होण्यास मदत होते. शेतकऱ्यांच्या पिकांना हवे त्यावेळी त्याद्वारे पाणी पुरविण्याचे कार्य होत असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व सडक-अर्जुनी ही दोन तालुके वगळता सर्वच तालुक्यांमध्ये सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. याचा कितपत लाभ शेतकऱ्यांना होईल, हे पुढील हंगामातील उत्पन्नानुसार कळणार आहे. शिवाय बांधकामाबाबत कृषी विभागाला उद्दिष्ट देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. शासन शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून विविध कृषी योजनांवर कोट्यवधी रूपये खर्च करते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्या नेहमीच ‘जैसे थे’ असतात. त्यामुळे या योजनांचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हा संशोधनाचा विषय ठरत आहे. (प्रतिनिधी)