शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

राज्यघटनेची निर्मिती बलशाली भारतासाठीच

By admin | Updated: May 18, 2017 00:18 IST

स्पर्धेच्या काळात भारत एक बलशाली राष्ट्र व्हावे ही संकल्पना मनात बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची निर्मिती केली.

किशोर : बुद्ध जयंती महोत्सव उत्साहात लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्पर्धेच्या काळात भारत एक बलशाली राष्ट्र व्हावे ही संकल्पना मनात बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची निर्मिती केली. परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेने हे साकार होऊ दिले नाही. ही उणीव बौद्धांनी भरुन काढावी, असे आव्हान ज्येष्ठ प्रबोधनकार इंजि. किशोर यांनी केले. येथील भीमनगरच्या मैदानावर आयोजित बुद्धजयंती महोत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद साखरे होते. मंचावर वन अधिकारी आनंद मेश्राम, समाज कल्याण अधिकारी राजेश रामटेके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक विलास वासनिक, प्रा. प्रिया शहारे, नरेंद्र मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी धर्मग्रंथांची ओळख पटवून देताना इंजि. किशोर पुढे म्हणाले की, जगाच्या पाठीवर ख्रिश्चन धर्माचे होली बायबल, कम्युनिझमचे दास कॅपीटल आणि इस्लामचे कुराण हे पवित्र गं्रथ म्हणून ओळख आहे. धार्मिक चळवळीमध्ये जगात बौद्धांचा धर्मग्रंथ म्हणून ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ एकच असावा. यामुळेच भारत बौद्धमय करण्याचा संकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा होता. त्यामुळे बौद्धांनी नैतिकतेची उपासना करावी असे सांगून बुद्धाचे आंदोलन म्हणजे क्रांती असून सामाजिक, आर्थिक परिवर्तनीय आंदोलन होय असे ते म्हणाले. यावेळी बोलतना समाजकल्याण अधिकारी रामटेके यांनी जनगणनेच्यावेळी बौद्ध लिहिण्याची विनंती केली. परंतु बौद्ध लिहिण्याबरोबरच बुद्धाची शिकवण अंगीकार करुन आचरणात आणण्याची गरज आहे असे ते म्हणाले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. नागपूरच्या आॅकेस्ट्राने बुद्धगीतांचा नजराना पेश केला. यावेळी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करुन समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष अरविंद साखरे यांनी मांडले. संचालन डॉ. राजेश उके यांनी केले. आभार सुनील भरने यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.जी. वाघमारे, दीपक (बाबा) वाहने, दिपक घरडे, दलेश नागदवने, ललीत गोंडाणे, एम.पी. भेलावे, आनंद बन्सोड, अ‍ॅड. एकता गणवीर, जे.सी. बागडे, अरविंद सूर्यवंशी, मिलींद पानतावने, अनिल मेश्राम, प्रविण कांबळे, विपूल उके, रोशन कावळे, सुनील गणवीर, मनोज खोब्रागडे, पंकज वासनिक, सुशील गणवीर, सुनील डोंगरे, सुनील गणवीर, कमलेश उके, राजू कडबे, स्नेहा गडपायले, सिद्धार्थ चंद्रीकापुरे, नीलम मेश्राम, नुरलाल उके, सुरेश रंगारी, राजरतन डोंगरे, संतोष डोंगरे, रत्नदीप भिमटे यांनी सहकार्य केले.