शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

मच्छीमार संस्था उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: August 26, 2015 01:50 IST

स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्षी पहिल्यांदाच मासेमारी करणाऱ्या समाजावर संकट ओढवले आहे.

समाज संकटात : पारंपरिक व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावरबाराभाटी : स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्षी पहिल्यांदाच मासेमारी करणाऱ्या समाजावर संकट ओढवले आहे. मासेमारी करणाऱ्या समाजाला देशोधडीला लावण्याचे व त्यांना गुलामीत वेठबिगारासारखे जीवन जगण्यास भाग पाडण्यासाठी २६ जून रोजी राज्य शासनाने एक काळा कायदा अस्तित्वात आणला. त्यामुळे मत्स्यमार समाजावर संकट ओढवल्याचे समाजाचे प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.तलाव किंवा जलाशयामध्ये मत्स्य व्यवसायाकरिता राबविण्यात येणाऱ्या तलाव कंत्राट धोरणामध्ये जलक्षेत्र व पारंपरिक मच्छीमारांचे हित लक्षात घेऊन सुधारित तलाव कंत्राट धोरण राबविण्याचा शासनाचा उदात्त हेतू असल्याचे दिसून येते. त्याच अनुषंगाने २२ आॅक्टोबर २०१३ मध्ये एक निर्णय निर्गमित करण्यात आला. परंतु त्या निर्णयात पुन्हा सुधारणा करून ५ डिसेंबर २०१३ रोजी शासनाकडून शुध्दीपत्रक काढण्यात आले. आज ज्या २०० हेक्टर तलावांवर एक संस्था शासनाच्या नियमाप्रमाणे लिज भरून मासेमारी करते, तेथे पुन्हा ५० हेक्टर एकक मानून चार प्राथमिक संस्थांची नोंदणी करायची. त्यांच्यात स्पर्धा लावून जी संस्था जास्त बोली बोलेल त्या संस्थेला तलाव कंत्राटावर द्यायचे. उरलेल्या बाकीच्या संस्थांनी ठराविक रोजीप्रमाणे मासेमारी करायची. जे लोक कालपर्यंत मालकाप्रमाणे काम करायचे त्यांनी उद्या लाखो रुपये कंत्राट घेणाऱ्याकडे वेठबिगारासारखे काम करायचे. ज्यांची नोंदणी शासनाने करून दिली, त्या स्थापन केलेल्या संस्थाचे काय होणार? ज्यांच्यावर मत्स्यमारांची उपजीविका निर्भर आहे, त्या पारंपरिक व्यवसायांचे काय? असे अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण होत आहेत. पण शासन एवढ्यावरच न थांबता ज्या लहानसहान संस्थांकडे १०० हेक्टरखाली तलाव आहेत, त्यांचे अधिकार ग्रामपंचायतींना देऊन जास्त रक्कम भरणाऱ्यांना किंवा जास्त बोली बोलणाऱ्यांना द्यायचे.हा प्रकार म्हणजे गरीब मत्स्यमारांच्या संस्थांना देशोधडीला लावून त्यांची भाकर हिसकावून मोठ्या कंत्राटदारांना द्यायचे षडयंत्र महसूल वाढविण्याच्या नावाखाली सुरू आहेत.शासनाने विचार करून गरीब मत्स्यमार समाजावर अन्याय करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)