शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

प्रकल्पांत ठणठणाट

By admin | Updated: May 23, 2015 01:39 IST

गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत अवघा ७२ टक्केच पाऊस झाल्यामुळे ििजल्ह्यातील जलाशयांचा तळ उघडा पडला आहे.

गोंदिया : गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत अवघा ७२ टक्केच पाऊस झाल्यामुळे ििजल्ह्यातील जलाशयांचा तळ उघडा पडला आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत यंदा नाममात्र पाणीसाठी उपलब्ध आहे. चारपैकी दोन मोठे प्रकल्प आटले असून अन्य प्रकल्पांतही पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे पावसाळा लांबल्यास भिषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलवांचा जिल्हा म्हणून ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील यंदाची पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. जिल्ह्याला पाण्याची पुर्तता करण्यासाठी चार मोठे प्रकल्प, १० मध्यम प्रकल्प तर २० लघु प्रकल्प आहेत. याखेरीज ३८ जुने मालगुजारी तलाव आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत असूनही आजघडीला हे सर्व प्रकल्प आॅक्सीजनवर आहेत. या प्रकल्पांतील पाण्याची पातळी अत्यंत खालावली असून फक्त नाममात्र पाण्याची नोंद संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांवर नजर टाकल्यास इटियाडोह प्रकल्पात फक्त २९.६८ दलघमी (९.३२ टक्के) तर सिरपूर प्रकल्पात ८.९५ दलघमी (४.६५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. येथे आश्चर्याची बाब म्हणजे मागील वर्षी याच दिवशी इटियाडोह प्रकल्पात ७३.४५ दलघमी (२३.०३ टक्के) तर सिरपूर प्रकल्पात ४५.७६ दलघमी (२३.७६ टक्के) पाणीसाठी होता. शिवाय पूजारीटोला व कालीसराड हे मोठे धरण कोरडे पडले आहेत. त्यात उपयुक्त जलसाठा उपलब्ध नाही. यावरून मोठ्या प्रकल्पांची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत हलाखीची असल्याचे स्पष्ट दिसून येते. मध्यम प्रकल्पांचीही हीच स्थिती आहे. जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्पांपैकी उमरझरी प्रकल्पात १२.०८ टक्के पाण्याची नोेंद असून उर्वरीत सर्व प्रकल्पांत नाममात्र पाणीसाठा आहे. तसेच २० लघु प्रकल्पांचीही ही स्थिती आहे. तिरोडा तालुक्यातील भदभद्या प्रकल्पात १४.०१ टक्के, सडक अर्जुनी तालुक्यातील मोगरा प्रकल्पात २६.३८ टक्के, सालेकसा तालुक्यातील पिपरीया प्रकल्पात १६.५४ टक्के व देवरी तालुक्यातील रेहाडी प्रकल्पात १७.४३ टक्के पाण्याची नोंद असून उर्वरित प्रकल्प १० टक्केच्या आत आहेत. (शहर प्रतिनिधी)मालगुजारी तलावांचीही स्थिती गंभीर पाटबंधारे विभागाकडे ३८ माजी मालगुजारी (मामा) तलावांची नोंद आहे. यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोकना तलावात १२.८६ टक्के, लेंडेझरी तलावात ११.३६ टक्के, पुतळी तलावात ४७.७८, सौंदड तलावात २५.५१ टक्के, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकूडा तलावात ९२.४३ टक्के, तिरोडा तालुक्यातील नांदलपार तलावात ११.८१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर उर्वरीत तलावांतही अन्य प्रकल्पांप्रमाणेच नाममात्र पाणीसाठी असून येत्या काही दिवसांत हे तलाव आटतील अशी परिस्थिती आहे.... अन्यथा पाण्यासाठी होणार मारामारपावसाळा सुरू होण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी आहे. प्रकल्पांची ही स्थिती पाहता वेळीच पाऊस पडणे गरजेचे आहे. पावसाने हुलकावणी दिली तर मात्र येत्या काळात या प्रकल्पांतील पाणी आटणार यात शंका नाही. असे झाल्यास पाण्यासाठी जिल्ह्यात मोठी मारामार सुरू होऊ शकते. ही स्थिती निर्माण झाली असल्यामुळे आता पाण्याचे महत्व ओळखून त्याचा अपव्यय टाळून जास्तीत जास्त पाणी साठविण्याची गरज निर्माण झाली आहे.