शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:24 IST

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : निवडणूक आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर शुक्रवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेवून निवडणुकीसंदर्भात माहिती देताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एस.एन.चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.बलकवडे यांनी, लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात रोकड व दारु च्या वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्याचे सांगितले.तसेच, आचारसंहिता लागू होताच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेचा चोखपणे बंदोबस्त ठेवावा. धार्मिक स्थळांवर निवडणुकीचा प्रचार करण्यास पूर्णत: बंदी आहे. दुसऱ्याच्या नावावर मतदान करणे हा एक गुन्हा आहे. मतदान करण्याकरीता दिव्यांग व्यक्तीची जाण्या-येण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी. निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणारे लाऊडस्पीकर फक्त सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत चालू राहील याची पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगीतले.राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराच्या ‘रोड शो’साठी पोलीस विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान प्लास्टीकचा वापर टाळायचा आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर नविन कार्यक्र म सुरु करता येणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. निवडणुकीविषयी कुठलीही सभा होत असेल तर पोलीस विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.आचारसंहिता लागू होताच शासकीय होर्डींगवरील फ्लेक्स २४ तासांत काढून घ्यायचे आहेत, तर खाजगी क्षेत्रातील होर्डींगवरील फ्लेक्स ७२ तासांत काढायचे आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.अन्यथा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईबैठकीत आदर्श आचारसंहिता विषयक माहिती देताना डॉ. बलकवडे यांनी, लोकसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात व निष्पक्षपणे पार पाडावी. आचारसंहितेत कोणत्याही अधिकाºयांनी राजकीय पदाधिकाºयांशी भेट घेवू नये, नाही तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी