राम वाघ : तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा थाटात आमगाव : अथक कष्ट, निश्चय, ध्येय व दुर्दम्य आत्मविश्वास यांच्या बळावरच स्पर्धा परिक्षेत विद्यार्थी टिकू शकतो. स्पर्धा परिक्षेतील अभ्यास केवळ प्रशासकीय अधिकारी बनवित नाही. तर विद्यार्थ्यांत प्रशासकीय अधिकाऱ्यांची योग्यताही निर्माण करते, असे प्रतिपादन नागपूरच्या आकार फाऊंडेशनचे संचालक राम वाघ यांनी केले. येथील लक्ष्मणराव मानकर गुरूजी संकुलात बुधवारी (दि.१५) राज्य तंत्र्शिक्ष मंडळाच्यावतीने आयोजित स्थलित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भवभूती शिक्षण संस्थेचे सचिव केशव मानकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी मेश्राम, लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी.के. संघी, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य संदीप हनवते, एस.बी.आयचे अधिकारी पंकज शरणागत, नितीन इंदुरवाडे, कोरसटवार, मनोज लुलू, अंजनकर, बेनीमाधव कावळे उपस्थित होते. याप्रसंगी मानकर यांनी, संधी उपलब्ध करवून देणे हे आमच्या हाती असले तरीही त्या संधीचे सोने करणे हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असल्याचे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने आपले व आपल्या परिसराचे नावलौकिक करावे अशी इच्छाही व्यक्त केली. तर गज्जलवार यांनी, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी, त्यातील अडचणी व मार्ग यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्नांना अतिशय सोप्या शब्दात उत्तरे दिली. प्रास्ताविक डॉ. संधी यांनी मांडले. संचालन प्रा. जयंत बंसोड यांनी केले. आभार प्रा. हनवते यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. राहूल संघी, प्रा.पंकज कटरे यांच्यासह मानकर ग्रुपच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)विद्यार्थ्यांनो ‘सैराट व्हा’मेळाव्यात मार्गदर्शन करताना राम वाघ यांनी विद्यार्थ्यांना सैराट व्हा, असा मंत्र दिला. मात्र कोणतीही नोकरी केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसते, तर ती देश आणि समाजसेवेची उत्तम संधी असते याचा भान ही करवून दिला.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यात क्षमता निर्माण करते
By admin | Updated: June 19, 2016 01:35 IST