शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST

गोंदिया : शासनाच्या विविध योजना, मोहीम व अभियानांची जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ...

गोंदिया : शासनाच्या विविध योजना, मोहीम व अभियानांची जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मंगळवारी (दि.२७) ग्राम कारंजा येथील पोलीस कवायत मैदानात ७१ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. देशमुख यांनी पुरोगामी महाराष्ट्र हे देशातील एक समर्थ आणि संपन्न असे राज्य आहे, महाराष्ट्राने देशात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे, कृषी, सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे, या राज्याला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र कटिबद्ध आहे, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून, सन २०२०-२१ मध्ये २५३.६७ कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या विकासाच्या योजना राबविल्या जाणार आहेत. गोंदिया येथे सात कोटी खर्च करून जिल्हा नियोजन भवनाचे बांधकाम प्रस्तावित आहे. जिल्ह्यात असलेल्या सर्व नगर पंचायतींकरिता अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी ६.५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत दराचा लाभ मिळावा म्हणून आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात ११४ आधारभूत धान खरेदी केंद्रे उघडण्यात आलेी. १८६८ रुपये प्रतिक्विंटल दराने १६ लाख ९३ हजार ३४६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. ३६१ कोटी ७४ लक्ष ३१ हजार रुपये धान खरेदीचे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला योग्य भाव मिळण्यास मदत झाली आहे. शासनाने यावर्षी धानाला ७०० रुपये बोनस जाहीर करून धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यात रबी व खरीप हंगामासाठी ६५ हजार ३५३ खातेदारांना ३०८ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले, असे देशमुख यांनी सांगितले.

जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मत्स्यबीज व मासोळी लाभार्थ्यांना ३२.७९ लक्ष वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात ३२ हजार ८७१ नोंदीत कामगारांच्या खात्यात सहा कोटी ५७ लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांचे सतत नक्षल विरोधी अभियान लोकोपयोगी सिव्हिक ॲक्शन प्रोग्राम राबविले जात असल्याने नक्षलवादाला आळा बसून विकासात्मक कामांना गती प्राप्त झाली आहे. राज्यात साडेबारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपवनसंरक्षक कुलराज सिंग, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. संचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

--------------------------

कोरोना उपाययोजनांवर अंमल आवश्यक

याप्रसंगी नादेशमुख यांनी कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध उपाययोजना करून कोरोनामुक्तीचा दर ९६.८५ टक्क्यांवर आणला आहे. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा कोरोनामुक्ती दर अधिक आहे, तर मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी धोका मात्र टळला नाही. जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली असून, लसीकरणाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. मात्र, लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी

मास्कचा वापर, सॅनिटायझेशन व फिजिकल डिस्टन्सिंग या उपाययोजनांवर अंमल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.