शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा....सलग दुसऱ्या दिवशी बाधितांची संख्या शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी १४० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १२५ नमुन्यांची आरटीपीसीआर तर १५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट ...

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी १४० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १२५ नमुन्यांची आरटीपीसीआर तर १५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,४८,६०२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २,२९,०३४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,१९,५६८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१,२०८ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०,४९६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात आठ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

..........

६४ टक्क्यावर लसीकरण

कोरोना संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी जिल्ह्यातील ११० केंद्रावरून लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ८,३२,६११ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जवळपास ६४ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात लसीकरणाला वेग आल्याचे चित्र आहे.

................

संसर्ग आटोक्यात तरी काळजी घ्या

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. त्यामुळे काही जण पुन्हा निष्काळजीपणे वागू लागले आहे. मास्कचा वापर करणेसुद्धा बंद केले आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसून पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत काळजी घ्यावी.

- डाॅ. नरेश तिरपुडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

.......

सणासुदीच्या दिवसात घ्या काळजी

जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असली तरी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्यात लवकर कोरोनामुक्त होईल. सध्या सणासुदीचे दिवस असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे आहे.

- डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक केटीएस.

..............

आपले थोडेही दुर्लक्ष ठरू शकते घातक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट येऊच जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे तेवढ्याच गांभीर्याने पालन करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आदी गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपले थोडेही दुर्लक्ष कोरोनाला पुन्हा निमंत्रण देणारे ठरू शकते.

- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.