शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

आओ जाओ घर तुम्हारा ! बसस्थानक, रेल्वे स्थानक, जिल्हा सीमा कुठेच तपासणी नाही : कोरोना रोखणार तरी कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील दहा ते पंधरा दिवसापासून लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या जिल्ह्यातील ...

ठळक मुद्देवाढत्या संसर्गात काय उपाययोजना केल्या ?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दहा ते पंधरा दिवसापासून लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या जिल्ह्यातील नागरिक बस, रेल्वे आणि खासगी वाहनाने नियमितपणे ये-जा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर सुध्दा नागपूर, पुणे, मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात नसून बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी सुध्दा केली जात नसल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानकावर पूर्वी थर्मल स्क्रिनिंगसह नावाची नोंदणी केली जात होती. मात्र आता सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण सुध्दा सहज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याच्या सीमेवर सुध्दा कुठलीच तपासणी केली जात नसून सर्वांसाठी रान मोकळे असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आओ जाओ घर तुम्हारा असे चित्र आहे. मात्र हा दुर्लक्षितपणा कोरोना वाढीला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.  

n जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असला तरी बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांमुळे यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक, बसस्थानक या ठिकाणी प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग तसेच त्यांचे नाव, पत्ता नोंदविण्याची गरज आहे. मात्र अद्यापही यासंदर्भातील सूचना प्रशासनाने या दोन्ही विभागांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे बिनधास्तपणे त्यांचा वावर सुरु आहे. n  कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वांना मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. लग्न सोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी दिली आहे. तर मद्य विक्रीची दुकाने आणि बीअर बार यांना रात्री ८ वाजतापर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. n रेल्वे स्थानक, बसस्थानक या मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

n गोंदिया मरारटोली येथील मुख्य बसस्थानकाला भेट दिली असता नागपूर व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची कसलीच तपासणी अथवा त्यांच्या नावाची नोंदणी केली जात नव्हती. n बस स्थानकावर अनेक प्रवासी विना मास्क आढळले. तर फिजिकल डिस्टन्सिंगचे सुध्दा कठोरपणे पालन केले जात नसल्याचे आढळले. n बस स्थानक परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती करणारे फलक मात्र लागले होते.  

n येथील रेल्वे स्थानकाला भेट दिली असता रेल्वे स्थानकावर बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची कुठलीच तपासणी केली जात नव्हती. n मुंबई, पुणे, तसेच इतर ठिकाणातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग अथवा त्यांच्या नावाची नोंदणी सुध्दा केली जात नव्हती. nलॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारासमोर चौकशी कक्ष सुरु केले होते ते सुध्दा आता गायब झालेले आढळले.

n  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने अद्यापही जिल्हा सीमेवर तपासणी नाके सुरु करण्यात आलेले नाही. n  त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील नागरिक बिनधास्तपणे ये-जा करीत आहे. n  जिल्हा सीमेवर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तपासणी करण्याची कुठलीच प्रक्रिया सुरू नाही. n  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. तरच प्रादुर्भाव कमी करता येईल. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या