शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना थंडीचा फटका, उन्हाचा चटका

By admin | Updated: January 17, 2016 01:39 IST

आपल्या शाळेचे नाव उंचावले जावे म्हणून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग ऊन, थंडीचा तमा न बाळगता तब्बल २ ते ३ महिने राबताना दिसतात.

विजय मानकर सालेकसाआपल्या शाळेचे नाव उंचावले जावे म्हणून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग ऊन, थंडीचा तमा न बाळगता तब्बल २ ते ३ महिने राबताना दिसतात. पण त्यातून जिल्हास्तरावर निवडल्या जातात ते तालुक्यातील मोजकेच खेळाडू. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचा अभ्यासाला द्यायचा बराच वेळ वाया जात आहे.उद्घाटनाचा दिवशी सूर्योदयासोबतच खेळाडू विद्यार्थी कडकडत्या ठंडीमध्ये आपल्या शाळेचा झेंडा घेवून निघतात. कितीही थंडी असली तरी खेळाचा गणवेश अंगात घालून पूर्ण जोशात जयघोष करीत क्रीडास्थळाच्या गावाकडे मार्च करीत जातात. संपूर्ण चमू पूर्ण आवेशात असून आपण निश्चित विजयी होऊन येणार असा त्यांचा विश्वास असतो. आयोजनस्थळी चारही दिशेने अशा चमूंचे आगमन होतानाचे दृश्य बघून गावकरीसुध्दा भारावून जातात. गावात आयोजनाला आपण ही हातभार लावावा, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊन त्या भावनेला मूर्तरुप देण्यास प्रारंभ करतात. कोणी गावची साफसफाई तर कोणी चुना पाणी लावण्यात स्वत:ला व्यस्त करून घेतात. गावातील वातावरण सुध्दा क्रीडा महोत्सवामुळे उत्साहवर्धक असते. मुुलांच्या खेळाला बघण्यासाठी गावातील आबाल-वृध्द सर्वच मैदानात येतात. मजुरी करणारे महिला-पुरुष सुध्दा आपल्या कामावरून सुटी घेऊन खेळाचा आनंद घेण्यासाठी येतात. उद्घाटनाची वेळ आल्यानंतर संघ शिक्षक आपआपल्या खेळाडूंना झेंडा आणि शाळेच्या नावाची पाटी घेऊन मैदानात ओळीचे शांततेत बसायला लावतात. दुसरीकडे आयोजक उद्घाटन सोहळ्याच्या पाहुणे मंडळीची वाट बघत असतात. कोणी दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात व्यस्त असतात. दुसरीकडे विद्यार्थ्यांना या गोष्टीशी काही देणेघेणे नसते. पहाटेपासून उठून आलेले विद्यार्थी अस्वस्थ होतात आणि शिक्षक त्यांना गुराख्यासारखे रोखून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात.सहनशीलतेचा अंत...या खेळ महोत्सवाच्या उद्घाटन सत्रासाठी ठरविलेल्या पाहुण्यांची वाट पाहणे म्हणजे एक मोठे दिव्य काम असते. एक तास, दोन तास, तीन-तीन तास पाहुण्यांची वाट पहावी लागते. एकीकडे खेळाडू विद्यार्थी प्रतिक्षा करीत बसले असतात तर दूसरीकडे नेते मंडळी आपल्या दरबारात गप्पागोष्टी करीत असतात. जेव्हा मुलांची सगळी सहनशक्ती संपलेली असते तेव्हा पाहुण्यांचे आगमन होते. आयोजक मंडळी परंपरेनुसार स्वागत सोहळा, प्रास्ताविक, अहवाल, गावातील समस्या इत्यादींचा पाढा वाचतात. नेते मंडळीना बोलण्याची वेळ आली की एकदोन वाक्य खेळाबद्दल बोलले की मग आपल्याला श्रेय मिळावे या उद्देशाने राजकारणाच्या भाषेत बोलतात. विरोधी पक्षाकडे बोट दाखविण्याचे काम ही तेवढ्याच जोशात होते.