शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

विद्यार्थ्यांना थंडीचा फटका, उन्हाचा चटका

By admin | Updated: January 17, 2016 01:39 IST

आपल्या शाळेचे नाव उंचावले जावे म्हणून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग ऊन, थंडीचा तमा न बाळगता तब्बल २ ते ३ महिने राबताना दिसतात.

विजय मानकर सालेकसाआपल्या शाळेचे नाव उंचावले जावे म्हणून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग ऊन, थंडीचा तमा न बाळगता तब्बल २ ते ३ महिने राबताना दिसतात. पण त्यातून जिल्हास्तरावर निवडल्या जातात ते तालुक्यातील मोजकेच खेळाडू. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचा अभ्यासाला द्यायचा बराच वेळ वाया जात आहे.उद्घाटनाचा दिवशी सूर्योदयासोबतच खेळाडू विद्यार्थी कडकडत्या ठंडीमध्ये आपल्या शाळेचा झेंडा घेवून निघतात. कितीही थंडी असली तरी खेळाचा गणवेश अंगात घालून पूर्ण जोशात जयघोष करीत क्रीडास्थळाच्या गावाकडे मार्च करीत जातात. संपूर्ण चमू पूर्ण आवेशात असून आपण निश्चित विजयी होऊन येणार असा त्यांचा विश्वास असतो. आयोजनस्थळी चारही दिशेने अशा चमूंचे आगमन होतानाचे दृश्य बघून गावकरीसुध्दा भारावून जातात. गावात आयोजनाला आपण ही हातभार लावावा, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊन त्या भावनेला मूर्तरुप देण्यास प्रारंभ करतात. कोणी गावची साफसफाई तर कोणी चुना पाणी लावण्यात स्वत:ला व्यस्त करून घेतात. गावातील वातावरण सुध्दा क्रीडा महोत्सवामुळे उत्साहवर्धक असते. मुुलांच्या खेळाला बघण्यासाठी गावातील आबाल-वृध्द सर्वच मैदानात येतात. मजुरी करणारे महिला-पुरुष सुध्दा आपल्या कामावरून सुटी घेऊन खेळाचा आनंद घेण्यासाठी येतात. उद्घाटनाची वेळ आल्यानंतर संघ शिक्षक आपआपल्या खेळाडूंना झेंडा आणि शाळेच्या नावाची पाटी घेऊन मैदानात ओळीचे शांततेत बसायला लावतात. दुसरीकडे आयोजक उद्घाटन सोहळ्याच्या पाहुणे मंडळीची वाट बघत असतात. कोणी दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात व्यस्त असतात. दुसरीकडे विद्यार्थ्यांना या गोष्टीशी काही देणेघेणे नसते. पहाटेपासून उठून आलेले विद्यार्थी अस्वस्थ होतात आणि शिक्षक त्यांना गुराख्यासारखे रोखून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात.सहनशीलतेचा अंत...या खेळ महोत्सवाच्या उद्घाटन सत्रासाठी ठरविलेल्या पाहुण्यांची वाट पाहणे म्हणजे एक मोठे दिव्य काम असते. एक तास, दोन तास, तीन-तीन तास पाहुण्यांची वाट पहावी लागते. एकीकडे खेळाडू विद्यार्थी प्रतिक्षा करीत बसले असतात तर दूसरीकडे नेते मंडळी आपल्या दरबारात गप्पागोष्टी करीत असतात. जेव्हा मुलांची सगळी सहनशक्ती संपलेली असते तेव्हा पाहुण्यांचे आगमन होते. आयोजक मंडळी परंपरेनुसार स्वागत सोहळा, प्रास्ताविक, अहवाल, गावातील समस्या इत्यादींचा पाढा वाचतात. नेते मंडळीना बोलण्याची वेळ आली की एकदोन वाक्य खेळाबद्दल बोलले की मग आपल्याला श्रेय मिळावे या उद्देशाने राजकारणाच्या भाषेत बोलतात. विरोधी पक्षाकडे बोट दाखविण्याचे काम ही तेवढ्याच जोशात होते.