शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना थंडीचा फटका, उन्हाचा चटका

By admin | Updated: January 17, 2016 01:39 IST

आपल्या शाळेचे नाव उंचावले जावे म्हणून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग ऊन, थंडीचा तमा न बाळगता तब्बल २ ते ३ महिने राबताना दिसतात.

विजय मानकर सालेकसाआपल्या शाळेचे नाव उंचावले जावे म्हणून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग ऊन, थंडीचा तमा न बाळगता तब्बल २ ते ३ महिने राबताना दिसतात. पण त्यातून जिल्हास्तरावर निवडल्या जातात ते तालुक्यातील मोजकेच खेळाडू. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचा अभ्यासाला द्यायचा बराच वेळ वाया जात आहे.उद्घाटनाचा दिवशी सूर्योदयासोबतच खेळाडू विद्यार्थी कडकडत्या ठंडीमध्ये आपल्या शाळेचा झेंडा घेवून निघतात. कितीही थंडी असली तरी खेळाचा गणवेश अंगात घालून पूर्ण जोशात जयघोष करीत क्रीडास्थळाच्या गावाकडे मार्च करीत जातात. संपूर्ण चमू पूर्ण आवेशात असून आपण निश्चित विजयी होऊन येणार असा त्यांचा विश्वास असतो. आयोजनस्थळी चारही दिशेने अशा चमूंचे आगमन होतानाचे दृश्य बघून गावकरीसुध्दा भारावून जातात. गावात आयोजनाला आपण ही हातभार लावावा, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊन त्या भावनेला मूर्तरुप देण्यास प्रारंभ करतात. कोणी गावची साफसफाई तर कोणी चुना पाणी लावण्यात स्वत:ला व्यस्त करून घेतात. गावातील वातावरण सुध्दा क्रीडा महोत्सवामुळे उत्साहवर्धक असते. मुुलांच्या खेळाला बघण्यासाठी गावातील आबाल-वृध्द सर्वच मैदानात येतात. मजुरी करणारे महिला-पुरुष सुध्दा आपल्या कामावरून सुटी घेऊन खेळाचा आनंद घेण्यासाठी येतात. उद्घाटनाची वेळ आल्यानंतर संघ शिक्षक आपआपल्या खेळाडूंना झेंडा आणि शाळेच्या नावाची पाटी घेऊन मैदानात ओळीचे शांततेत बसायला लावतात. दुसरीकडे आयोजक उद्घाटन सोहळ्याच्या पाहुणे मंडळीची वाट बघत असतात. कोणी दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात व्यस्त असतात. दुसरीकडे विद्यार्थ्यांना या गोष्टीशी काही देणेघेणे नसते. पहाटेपासून उठून आलेले विद्यार्थी अस्वस्थ होतात आणि शिक्षक त्यांना गुराख्यासारखे रोखून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात.सहनशीलतेचा अंत...या खेळ महोत्सवाच्या उद्घाटन सत्रासाठी ठरविलेल्या पाहुण्यांची वाट पाहणे म्हणजे एक मोठे दिव्य काम असते. एक तास, दोन तास, तीन-तीन तास पाहुण्यांची वाट पहावी लागते. एकीकडे खेळाडू विद्यार्थी प्रतिक्षा करीत बसले असतात तर दूसरीकडे नेते मंडळी आपल्या दरबारात गप्पागोष्टी करीत असतात. जेव्हा मुलांची सगळी सहनशक्ती संपलेली असते तेव्हा पाहुण्यांचे आगमन होते. आयोजक मंडळी परंपरेनुसार स्वागत सोहळा, प्रास्ताविक, अहवाल, गावातील समस्या इत्यादींचा पाढा वाचतात. नेते मंडळीना बोलण्याची वेळ आली की एकदोन वाक्य खेळाबद्दल बोलले की मग आपल्याला श्रेय मिळावे या उद्देशाने राजकारणाच्या भाषेत बोलतात. विरोधी पक्षाकडे बोट दाखविण्याचे काम ही तेवढ्याच जोशात होते.