शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

सफाई अभियानाचे काम दिसेना

By admin | Updated: June 13, 2016 00:10 IST

मुंबईत हजेरी लावल्यानंतर वरूणदेव जिल्ह्याची कधीही आंघोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील चित्र जैसे थे : नाल्या तुंबलेल्या व कचरा पडूनच गोंदिया : मुंबईत हजेरी लावल्यानंतर वरूणदेव जिल्ह्याची कधीही आंघोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही शहरातील नाल्या व कचऱ्याची स्थिती जैसे थेच दिसून येत आहे. यामुळे मान्सूनपूर्व सफाई अभियानाला घेऊन संभ्रम निर्माण होत असून सफाई अभियान राबविले जात असताना त्याचे काम मात्र दिसून येत नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेच्यावतीने मान्सनपूर्व सफाई अभियान राबविले जाते. यंदाही नगर परिषदेने अभियान हाती घेतले. यासाठी जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात आली. तर शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईसाठी २० सफाई कामगारांची टीम कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आली आहे. जेसीबीच्या माध्यमातून नाल्यांची सफाई केल्याचे नगर परिषदेकडून कळले. मात्र नाल्यांचे चित्र बघितल्यास ते होते तसेच दिसून येत आहेत. यातून नाल्यांतील गाळ पूर्णपणे उपसण्यात आला नसल्याचेही आता शहरवासी बोलत आहेत. याशिवाय शहरातील सांडपाण्याची निकासी करीत असलेल्या मुख्य नाल्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेने २० सफाई कामगार कंत्राटी तत्वावर घेतले आहेत. सोमवारपासून (दि.६) या सफाई कामगारांकडून नाल्यांची सफाई करविण्यात येणार असल्याचे सांगीतले गेले. मात्र या कामगारांकडून कोणत्या भागातील नाल्यांची सफाई करविण्यात आली हे कळतच नाही. विशेष म्हणजे शहरातील बाजार भागातील नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यांची सफाई करण्यात आली नाही. अशात पावसाच्या पाण्याची निकासी कशी होणार असा प्रश्न येथे पडतो. आता कधीही पाऊस बरसणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. असे असतानाही शहरातील नाल्या व घाण आहे त्यात स्थितीत असल्याने यंदाचा पावसाळा शहरवासीयांसाठी डोकेदुखीचाच ठरणार असल्याचे दिसते. त्यामुळे जोर लावून सफाईची कामे पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरण्याची समस्या सुटणार नाही. (शहर प्रतिनिधी)