शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

सफाई अभियानाचे काम दिसेना

By admin | Updated: June 13, 2016 00:10 IST

मुंबईत हजेरी लावल्यानंतर वरूणदेव जिल्ह्याची कधीही आंघोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील चित्र जैसे थे : नाल्या तुंबलेल्या व कचरा पडूनच गोंदिया : मुंबईत हजेरी लावल्यानंतर वरूणदेव जिल्ह्याची कधीही आंघोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही शहरातील नाल्या व कचऱ्याची स्थिती जैसे थेच दिसून येत आहे. यामुळे मान्सूनपूर्व सफाई अभियानाला घेऊन संभ्रम निर्माण होत असून सफाई अभियान राबविले जात असताना त्याचे काम मात्र दिसून येत नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेच्यावतीने मान्सनपूर्व सफाई अभियान राबविले जाते. यंदाही नगर परिषदेने अभियान हाती घेतले. यासाठी जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात आली. तर शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईसाठी २० सफाई कामगारांची टीम कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आली आहे. जेसीबीच्या माध्यमातून नाल्यांची सफाई केल्याचे नगर परिषदेकडून कळले. मात्र नाल्यांचे चित्र बघितल्यास ते होते तसेच दिसून येत आहेत. यातून नाल्यांतील गाळ पूर्णपणे उपसण्यात आला नसल्याचेही आता शहरवासी बोलत आहेत. याशिवाय शहरातील सांडपाण्याची निकासी करीत असलेल्या मुख्य नाल्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेने २० सफाई कामगार कंत्राटी तत्वावर घेतले आहेत. सोमवारपासून (दि.६) या सफाई कामगारांकडून नाल्यांची सफाई करविण्यात येणार असल्याचे सांगीतले गेले. मात्र या कामगारांकडून कोणत्या भागातील नाल्यांची सफाई करविण्यात आली हे कळतच नाही. विशेष म्हणजे शहरातील बाजार भागातील नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यांची सफाई करण्यात आली नाही. अशात पावसाच्या पाण्याची निकासी कशी होणार असा प्रश्न येथे पडतो. आता कधीही पाऊस बरसणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. असे असतानाही शहरातील नाल्या व घाण आहे त्यात स्थितीत असल्याने यंदाचा पावसाळा शहरवासीयांसाठी डोकेदुखीचाच ठरणार असल्याचे दिसते. त्यामुळे जोर लावून सफाईची कामे पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरण्याची समस्या सुटणार नाही. (शहर प्रतिनिधी)