शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

शहर विकासाचे घोडे अडले जिल्हाधिकारी कार्यालयात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

आमगाव : आमगाव नगरपरिषद स्थापनेपासून तर सद्यस्थितीत शासन,प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे विकासासाठी नागरिकांच्या अधिकारांचे हनन करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये ...

आमगाव : आमगाव नगरपरिषद स्थापनेपासून तर सद्यस्थितीत शासन,प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे विकासासाठी नागरिकांच्या अधिकारांचे हनन करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाने आमगाव ग्रामपंचायतला सन २०१५ मध्ये नगरपंचायत व तद्नंतर २ ऑगस्ट २०१७ रोजी ८ गावे मिळवून नगरपरिषदेची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत शहर विकासाचे मार्ग शासन,प्रशासन व न्यायालयातील प्रक्रियेत गुंफले आहे. ग्रामपंचायत व नगरपरिषद यातील राजकीय द्वेष नागरिकांच्या अंगलट पालटले आहे. सर्वोच्य न्यायालयाने यातील वाद न्यायप्रविष्ट केला असून नगरपरिषद सद्यस्थितीत कायम ठेवली आहे. परंतु शासन,प्रशासनाने न्यायालयात दाखल याचिकेमुळे आपले विकासाचे मार्ग अडवून धरले आहे. नागरिकांना विकास कामे ,रोजगार, आवास योजना, जमिनीचे पट्टे प्रकरण या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण असून सुद्धा शासन,प्रशासनानाला यातील मार्ग काढण्यास यश मिळाले नाही. नागरिक नगरपरिषदेचे कर व विविध आकारणीसह लागणारी प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. पण मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापासून हिरावल्या जात आहेत. शासन,प्रशासनाने नागरिकांना विकास कामे मिळवून देणे हे त्यांचे मूलभूत अधिकार आहे. पण नागरिकांना त्यांच्या सुविधा व विकासापासून दूर ठेवून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करण्यात येत आहे. विकासकामांचे जे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले त्याचे घोडे नगरप्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय व आयुक्त यांच्याकडे अडले आहे.

नगरोत्थान, दलित वस्ती सुधार, विशेष निधी कामे, आवास योजना, शौचालय योजना, राज्य रोजगार हमी योजना, वाढीव पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व विविध विकासात्मक कामांचे नियोजन करण्यात प्रशासनाने वेळकाढूपणा केला आहे. अनेक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासनात टक्केवारीची अट घातली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रस्ताव धूळ खात आहे व याचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे.

--------------------------.

नेते-पुढारी ठरले दुबळे

राजकारणात सत्ताकाबीज करण्यासाठी जनतेसमोर विकासाचा उदो-उदो करणारे सर्वच राजकीय पक्षातील नेते-पुढारी नागरिकांची कामे व मूलभूत सुविधा याकडे पाठ दाखवून उभे आहेत. सत्तेची लालसा जोपासणारे नेते-पुढारी आज नापास ठरले आहे. तर शासनदरबारी योग्य दखल घेतली जात नसल्याने जनतेच्या समस्यांवर उपाययोजना तयार करण्यात आली नाही. त्यामुळे आज जनतेला आपली कामे व मौलिक अधिकार मिळविण्यासाठी स्वत: लढा उभारण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.