शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

शहर विकासाचे घोडे अडले जिल्हाधिकारी कार्यालयात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

आमगाव : आमगाव नगरपरिषद स्थापनेपासून तर सद्यस्थितीत शासन,प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे विकासासाठी नागरिकांच्या अधिकारांचे हनन करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये ...

आमगाव : आमगाव नगरपरिषद स्थापनेपासून तर सद्यस्थितीत शासन,प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे विकासासाठी नागरिकांच्या अधिकारांचे हनन करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाने आमगाव ग्रामपंचायतला सन २०१५ मध्ये नगरपंचायत व तद्नंतर २ ऑगस्ट २०१७ रोजी ८ गावे मिळवून नगरपरिषदेची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत शहर विकासाचे मार्ग शासन,प्रशासन व न्यायालयातील प्रक्रियेत गुंफले आहे. ग्रामपंचायत व नगरपरिषद यातील राजकीय द्वेष नागरिकांच्या अंगलट पालटले आहे. सर्वोच्य न्यायालयाने यातील वाद न्यायप्रविष्ट केला असून नगरपरिषद सद्यस्थितीत कायम ठेवली आहे. परंतु शासन,प्रशासनाने न्यायालयात दाखल याचिकेमुळे आपले विकासाचे मार्ग अडवून धरले आहे. नागरिकांना विकास कामे ,रोजगार, आवास योजना, जमिनीचे पट्टे प्रकरण या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण असून सुद्धा शासन,प्रशासनानाला यातील मार्ग काढण्यास यश मिळाले नाही. नागरिक नगरपरिषदेचे कर व विविध आकारणीसह लागणारी प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. पण मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापासून हिरावल्या जात आहेत. शासन,प्रशासनाने नागरिकांना विकास कामे मिळवून देणे हे त्यांचे मूलभूत अधिकार आहे. पण नागरिकांना त्यांच्या सुविधा व विकासापासून दूर ठेवून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करण्यात येत आहे. विकासकामांचे जे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले त्याचे घोडे नगरप्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय व आयुक्त यांच्याकडे अडले आहे.

नगरोत्थान, दलित वस्ती सुधार, विशेष निधी कामे, आवास योजना, शौचालय योजना, राज्य रोजगार हमी योजना, वाढीव पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व विविध विकासात्मक कामांचे नियोजन करण्यात प्रशासनाने वेळकाढूपणा केला आहे. अनेक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासनात टक्केवारीची अट घातली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रस्ताव धूळ खात आहे व याचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे.

--------------------------.

नेते-पुढारी ठरले दुबळे

राजकारणात सत्ताकाबीज करण्यासाठी जनतेसमोर विकासाचा उदो-उदो करणारे सर्वच राजकीय पक्षातील नेते-पुढारी नागरिकांची कामे व मूलभूत सुविधा याकडे पाठ दाखवून उभे आहेत. सत्तेची लालसा जोपासणारे नेते-पुढारी आज नापास ठरले आहे. तर शासनदरबारी योग्य दखल घेतली जात नसल्याने जनतेच्या समस्यांवर उपाययोजना तयार करण्यात आली नाही. त्यामुळे आज जनतेला आपली कामे व मौलिक अधिकार मिळविण्यासाठी स्वत: लढा उभारण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.