शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: August 19, 2014 23:48 IST

ग्रामीण भागात बस स्थानक व शाळा परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणे जोमात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकास बळावले आहेत.

रावणवाडी : ग्रामीण भागात बस स्थानक व शाळा परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणे जोमात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकास बळावले आहेत. ग्रामीण भागातील नागरिक ये-जा करण्यासाठी एसटीच्या बसेसचा वापर अधिक करतात. त्यामुळे बस थांब्याजवळ सतत नागरिकांची वर्दळ असते. तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात अनेकांनी खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. या भागात खाद्य पदार्थ विकण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. हॉटेलपेक्षा खाद्य पदार्थ ठेल्यांवर स्वस्त मिळत असल्याने तेथे खाद्य पदार्थ खाणाऱ्यांची गर्दी असते. परंतु सर्व खाद्य पदार्थ उघड्यावर विकल्या जात असल्यामुळे त्यावर वाहनांची धूळ मोठ्या प्रमाणात साचत असते. वातावरणात आर्द्रता असल्याने त्या पदार्थांवर माशाही सतत घोंगावत असतात. या पदार्थांवर जाळी किंवा झाकन ठेवणे आवश्यक असते. परंतु याकडे कुणीच लक्ष देत नाही. परिणामी असे खाद्य पदार्थ सेवन केल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. ग्रामीण भागातील काही प्रमुख गावांमध्ये आरोग्य केंद्र, बँक, शाळा-महाविद्यालय, पशू वैद्यकीय रूग्णालय, महसूल विभागाचे कार्यालय, पोलीस ठाणे आदी शासकीय कार्यालये आहेत. नागरिक विविध कामासाठी तेथे ये-जा करतात. दुपारची वेळ झाली तर काहीतरी खाण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नसतो. पैशाअभावी हॉटेलचे चैन त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते टपरीवरील अशा खाद्य पदार्थांचा आधार घेतात. समोसा, कचोरी, पाणीपुरी, भेल आदी उघड्यावरील पदार्थ सेवन केले जातात. परंतु या पदार्थांना एकही टपरीचालक झाकून ठेवत नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. ग्रामीण भागात सर्व शासकीय व खासगी रूग्णालयांजवळ नेहमीच रूग्णांची गर्दी दिसून येते. यासाठी संबंधित प्रशासनाने काही नियम तयार करून त्यांचे काटेकोरपणे पालन करायला लावणे, उघड्यावरील खाद्य पदार्थांचे नमूणे वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. परंतु संबंधित प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशा विक्रेत्यांचे फावत आहे. (वार्ताहर)