शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेच्या स्वप्नापायी आठ गावातील नागरिक भोगताहेत यातना ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

आमगाव: आमगाव नगर परिषद व्हावी, या तुटपुंज्या लोकांच्या मनस्थितीमुळे आमगावसह आठ गावातील लोकांना यातना भोगाव्या लागत आहेत. नागर ...

आमगाव: आमगाव नगर परिषद व्हावी, या तुटपुंज्या लोकांच्या मनस्थितीमुळे आमगावसह आठ गावातील लोकांना यातना भोगाव्या लागत आहेत. नागर परिषद आली की आपली पोळी शेकू, असा मानस असणाऱ्यांनी लोकांना धारेवर धरून न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने आमगाव हे नगर पंचायतच राहील आणि त्याच्या सोबत जोडल्या गेलेल्या सात गावांना ग्रामपंचायतच राहण्याचा निर्णय अबाधित राखला होता; परंतु नगर परिषदेच्या हव्यासापायी काही लोकांनी फडणवीस सरकारच्या काळात नगर परिषद व्हावी, हा हट्टहास धरला. तेव्हापासून या आठ गावातील लोकांची समस्या अजूनच वाढली आहे.

महाराष्ट्र शासनाने आमगाव ग्रामपंचायतला २०१५ मध्ये नगर पंचायत केले; परंतु आमगाव नगर परिषद व्हावी म्हणून दोघे जण उच्च न्यायालयात गेले. त्यावेळी उच्च न्यायालयाने सरकारवर ही जबाबदारी टाकली. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने आमगावातील काही लोकांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आमगावला नगर परिषद बहाल केली; परंतु आमगावसह जुळलेली आठ गावे कृषी क्षेत्रात आहेत. उद्योग धंदे नसल्याने आमगाव नगर परिषद नव्हे तर नगर पंचायत ठेवा आणि इतर गावांत ग्रामपंचायतच हवी, यासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे दोन कार्यकर्र्ते उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना आमगाव नगर परिषद व इतर गावे ग्रामपंचायत म्हणून निर्णय दिला; परंतु या निर्णयाला आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र शासनाने फडणवीस सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात टाकली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे; परंतु आमगावसह इतर गावातील लोकांना शासनाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे.

....

या कामांवर झाला परिणाम

नागरिकांना विकास कामे, रोजगार कामे, आवास योजना, जमिनीचे पट्टे प्रकरण या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण असूनसुद्धा शासन व प्रशासनाला यातील मार्ग काढण्यास यश मिळाले नाही. नागरिक नगर परिषदचे कर व विविध आकारणीसह लागणारी प्रक्रिया पूर्ण करीत आहेत; पण मिळणाऱ्या सुविधांपासून ते मुकत आहेत. शासन प्रशासनाने नागरिकांना विकास कामे मिळणे हे त्यांचे मूलभूत अधिकार आहेत; पण नागरिकांना त्यांच्या सुविधा व विकासासाठी त्यांच्या मूलभूत अधिकाराचे हनन करण्यात येत आहे. नागरिक सुविधाचे नग्रोथान, दलित वस्ती सुधार, विशेष निधी कामे, आवास योजना, शौचालय योजना ,राज्य रोजगार हमी योजना, वाढीव पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व विविध विकासात्मक कामे नियोजन करण्यात प्रशासनाने वेळकाढुपणा केला आहे.