शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

नगर परिषदेच्या स्वप्नापायी आठ गावातील नागरिक भोगताहेत यातना ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

आमगाव: आमगाव नगर परिषद व्हावी, या तुटपुंज्या लोकांच्या मनस्थितीमुळे आमगावसह आठ गावातील लोकांना यातना भोगाव्या लागत आहेत. नागर ...

आमगाव: आमगाव नगर परिषद व्हावी, या तुटपुंज्या लोकांच्या मनस्थितीमुळे आमगावसह आठ गावातील लोकांना यातना भोगाव्या लागत आहेत. नागर परिषद आली की आपली पोळी शेकू, असा मानस असणाऱ्यांनी लोकांना धारेवर धरून न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने आमगाव हे नगर पंचायतच राहील आणि त्याच्या सोबत जोडल्या गेलेल्या सात गावांना ग्रामपंचायतच राहण्याचा निर्णय अबाधित राखला होता; परंतु नगर परिषदेच्या हव्यासापायी काही लोकांनी फडणवीस सरकारच्या काळात नगर परिषद व्हावी, हा हट्टहास धरला. तेव्हापासून या आठ गावातील लोकांची समस्या अजूनच वाढली आहे.

महाराष्ट्र शासनाने आमगाव ग्रामपंचायतला २०१५ मध्ये नगर पंचायत केले; परंतु आमगाव नगर परिषद व्हावी म्हणून दोघे जण उच्च न्यायालयात गेले. त्यावेळी उच्च न्यायालयाने सरकारवर ही जबाबदारी टाकली. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने आमगावातील काही लोकांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आमगावला नगर परिषद बहाल केली; परंतु आमगावसह जुळलेली आठ गावे कृषी क्षेत्रात आहेत. उद्योग धंदे नसल्याने आमगाव नगर परिषद नव्हे तर नगर पंचायत ठेवा आणि इतर गावांत ग्रामपंचायतच हवी, यासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे दोन कार्यकर्र्ते उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना आमगाव नगर परिषद व इतर गावे ग्रामपंचायत म्हणून निर्णय दिला; परंतु या निर्णयाला आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र शासनाने फडणवीस सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात टाकली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे; परंतु आमगावसह इतर गावातील लोकांना शासनाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे.

....

या कामांवर झाला परिणाम

नागरिकांना विकास कामे, रोजगार कामे, आवास योजना, जमिनीचे पट्टे प्रकरण या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण असूनसुद्धा शासन व प्रशासनाला यातील मार्ग काढण्यास यश मिळाले नाही. नागरिक नगर परिषदचे कर व विविध आकारणीसह लागणारी प्रक्रिया पूर्ण करीत आहेत; पण मिळणाऱ्या सुविधांपासून ते मुकत आहेत. शासन प्रशासनाने नागरिकांना विकास कामे मिळणे हे त्यांचे मूलभूत अधिकार आहेत; पण नागरिकांना त्यांच्या सुविधा व विकासासाठी त्यांच्या मूलभूत अधिकाराचे हनन करण्यात येत आहे. नागरिक सुविधाचे नग्रोथान, दलित वस्ती सुधार, विशेष निधी कामे, आवास योजना, शौचालय योजना ,राज्य रोजगार हमी योजना, वाढीव पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व विविध विकासात्मक कामे नियोजन करण्यात प्रशासनाने वेळकाढुपणा केला आहे.