शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

कचरागाडीसाठी नागरिक आक्रमक

By admin | Updated: July 5, 2017 00:39 IST

नगर पंचायत अंतर्गत रस्त्यारस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे असल्यामुळे या कचऱ्याला कंटाळून येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महिन्याभरापासून रस्त्यावर कचरालोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नगर पंचायत अंतर्गत रस्त्यारस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे असल्यामुळे या कचऱ्याला कंटाळून येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.सडक-अर्जुनी नगर पंचायतला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. परंतु अजूनपर्यंत शहरामध्ये कचरा गाडीची व्यवस्था करण्यात आली नाही. मागील दोन वर्षापासून सर्व महिला आपली समस्या नगराध्यक्षांंना सांगून थकल्या आहेत. पण यावर कुणीही लक्ष देत नाही. फक्त कारणे सांगून मोकळे होतात. ही समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सडक-अर्जुनीचे मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्यात मतभेद आहेत. याचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कचरा महिलांसाठी गंभीर समस्या झाली आहे. या कचऱ्यामुळे एकमेकांच्या घरासमोर कचरा टाकल्यावरुन महिलांची भांडणे होत आहेत. कचऱ्यामुळे डास, साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाल्यांतील मलमा २५ दिवसांपासून रस्त्यावर पडला असल्यामुळे लोकांना ये-जा करण्याकरिता खूप त्रास होत आहे. शासन स्वच्छता मोहीम राबवितो. परंतु भाजपचे वर्चस्व असलेल्या सडक-अर्जुनीत अस्वच्छतेने लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सडक-अर्जुनी येथे कचरागाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनाच्या प्रत पालकमंत्री राजकुमार बडोले, नगराध्यक्ष, सभापती स्वच्छता नगर पंचायत कार्यालय सडक-अर्जुनी, तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली आहे.