शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श ग्राम’साठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

By admin | Updated: May 24, 2015 01:41 IST

आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन गावामध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देईलच पण खऱ्या अथार्ने मॉडेल गाव करण्यासाठी ...

भंडारा : आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन गावामध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देईलच पण खऱ्या अथार्ने मॉडेल गाव करण्यासाठी गावातील लोकांचा संपूर्ण सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी व्यक्त केले. सांसद आदर्श ग्राम योजनेची गाव विकास आराखडा कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात घेण्यात आली. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे आणि राज्यस्तरीय प्रशिक्षक ए.आर. शेख उपस्थित होते. या गावात भौतिक सुविधांसोबतच गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक, आर्थिक विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा. गावात अन्नधान्य वितरण करण्यासाठी बायोमेट्रीक पध्दती सुरु करावी. त्यासाठी गावात बायोमेट्रीक मशिन देण्यात येईल. गावातील सर्व कुटुंबांचे रजिस्ट्रेशन करुन घ्यावे. गावात सामाजिक न्यायाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच लोकांचे बँकेत खाते उघडून पंतप्रधान विमा योजनेचा लाभ गावातील लोकांना दयावा. यासाठी बँकेने गावात कॅम्प आयोजित करावा. गावातील १४ कुपोषित मुले कशामुळे कुपोषित आहेत याची कारणे शोधून मुलांवर तातडीने उपाय योजना करावी, गावातील प्रत्येक व्यक्तीचे हेल्थ कार्ड तयार करावे,असे निर्देश त्यांनी दिलेत.गावातील ११४ कुटुंबांना वीज जोडणी नाही. यासाठी वीज वितरण कंपनीने गावात कॅम्प घेवून सर्वांचे अर्ज भरुन घ्यावेत आणि वीज जोडणी करुन दयावी. कंपोस्ट खत प्रकल्प आणि शोष खड्डे तयार करुन गावात स्वच्छता राखली जाईल यांची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. याबाबत गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी. अंगणवाडी आणि शाळेमध्ये शौचालय आणि पाण्याची व्यवस्था असावी. तसेच सर्व कुटुंबियांकडे शौचालय बांधकाम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, चार्ज आॅफिसर तथा तुमसर गटविकास अधिकारी स्नेहा कुचळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)