शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

‘आदर्श ग्राम’साठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

By admin | Updated: May 24, 2015 01:41 IST

आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन गावामध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देईलच पण खऱ्या अथार्ने मॉडेल गाव करण्यासाठी ...

भंडारा : आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन गावामध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देईलच पण खऱ्या अथार्ने मॉडेल गाव करण्यासाठी गावातील लोकांचा संपूर्ण सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी व्यक्त केले. सांसद आदर्श ग्राम योजनेची गाव विकास आराखडा कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात घेण्यात आली. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे आणि राज्यस्तरीय प्रशिक्षक ए.आर. शेख उपस्थित होते. या गावात भौतिक सुविधांसोबतच गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक, आर्थिक विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा. गावात अन्नधान्य वितरण करण्यासाठी बायोमेट्रीक पध्दती सुरु करावी. त्यासाठी गावात बायोमेट्रीक मशिन देण्यात येईल. गावातील सर्व कुटुंबांचे रजिस्ट्रेशन करुन घ्यावे. गावात सामाजिक न्यायाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच लोकांचे बँकेत खाते उघडून पंतप्रधान विमा योजनेचा लाभ गावातील लोकांना दयावा. यासाठी बँकेने गावात कॅम्प आयोजित करावा. गावातील १४ कुपोषित मुले कशामुळे कुपोषित आहेत याची कारणे शोधून मुलांवर तातडीने उपाय योजना करावी, गावातील प्रत्येक व्यक्तीचे हेल्थ कार्ड तयार करावे,असे निर्देश त्यांनी दिलेत.गावातील ११४ कुटुंबांना वीज जोडणी नाही. यासाठी वीज वितरण कंपनीने गावात कॅम्प घेवून सर्वांचे अर्ज भरुन घ्यावेत आणि वीज जोडणी करुन दयावी. कंपोस्ट खत प्रकल्प आणि शोष खड्डे तयार करुन गावात स्वच्छता राखली जाईल यांची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. याबाबत गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी. अंगणवाडी आणि शाळेमध्ये शौचालय आणि पाण्याची व्यवस्था असावी. तसेच सर्व कुटुंबियांकडे शौचालय बांधकाम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, चार्ज आॅफिसर तथा तुमसर गटविकास अधिकारी स्नेहा कुचळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)