शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

अजूनही राबताहेत बाल श्रमिक

By admin | Updated: May 13, 2014 23:41 IST

बाल श्रमिक उद्योजकांच्या शोषणाचे नेहमीच बळी ठरत आहेत. त्यांचे बालपण हिरावले जात आहे. केंद्र शासनाने बालमजुरीवर आळा घालण्यासाठी कायदा तयार केला आहे.

ंगोंदिया : बाल श्रमिक उद्योजकांच्या शोषणाचे नेहमीच बळी ठरत आहेत. त्यांचे बालपण हिरावले जात आहे. केंद्र शासनाने बालमजुरीवर आळा घालण्यासाठी कायदा तयार केला आहे. १४ वर्षांंंपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींना काम करताना पहिल्यांदा पकडल्या गेल्यास त्यांना कामावर ठेवणार्‍यांना तीन महिन्यांची शिक्षा व एक लाख रुपये दंड तसेच दुसर्‍यांदा पकडल्या गेल्यास दोन वर्षांंंची शिक्षा व पाच लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या कामचुकार कार्यप्रणालीमुळे या कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

जिल्ह्यात अनेक प्रकारचे धोकादायक उद्योग मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या उद्योगात बाल श्रमिक अधिक संख्येत काम करीत आहेत. १४ वर्षांंंपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून धोकादायक उद्योगात काम करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले असतानासुद्धा शेकडो मुले या क्षेत्रात कार्यरत आहेत.

गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पितळाचे भांडे तयार करण्याचे कारखाने, बिडी कारखाने, पोहामिल, राईस मिल, प्लास्टिक व अगरबत्ती उद्योग, होजियरी कारखाने, हॉटेल, रेस्टॉरंट, चहाटपरी आदी ठिकाणी ही मुले हमखास पाहावयास मिळतात. ज्यांच्या हातात पेन व पाठीवर स्कूल बॅग असायला पाहिजे, त्यांच्या हातात उद्योगात काम करण्याचे साहित्य पाहायला मिळत आहेत. कुटुंबातील दारिद्रय़ व गरिबीमुळे पोटाची आग शमविण्यासाठी ही मुले एकीकडे हजारोंच्या संख्येत या उद्योगात आपले लहानपण विसरले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदलासुद्धा मिळत नाही. त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचे कुशल व कलात्मक कार्य होत नसल्याने भविष्यात ते काहीच करू शकत नाही. १२ तासांपेक्षा अधिक काम केल्यानंतर या बालमजुरांना प्रदूषित वातावरण, प्रकाशाची कमी व अस्वस्थता मिळते.

गोंदिया जिल्ह्यात सर्वेक्षण अहवालानुसार नाममात्र बालकामगार कार्यरत असल्याचे शासनाच्या लेखी असले तरी प्रत्यक्षात ही गोष्ट पचनी पडत नाही. शासकीय अहवालात अशा प्रकारचे चमत्कार होणे स्वाभाविक आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या धोकादायक उद्योगातून बाल श्रमिकांना मुक्त करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. श्रम व कल्याण मंत्रालयाच्या वतीने या बाल श्रमिकांसाठी शिक्षणाची आधुनिक सोय करणे आवश्यक आहे. ज्यामुळे देशाच्या भविष्यापोटी मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल.

बालकामगारांचे पुनर्वसन व त्यांना सोईसुविधा देण्यासंदर्भात शासनाने कायदा केला असताना त्यांना कोणत्याही प्रकारच्या सोईसवलती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कामगार काम करतात, त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनासुद्धा कामाला लावले जाते. मात्र, त्याचा मोबदला हा अत्यल्प असतो.

आर्थिक परिस्थितीमुळे कामगार कोणत्याही चांगल्या-वाईट गोष्टीचे परिणाम न पाहता उद्योग व्यवसायात आपल्या मुलांना काम करण्यास आडकाठी करीत नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.(शहर प्रतिनिधी)