शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
4
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
5
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
6
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
7
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
10
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
11
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
12
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
13
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
14
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
15
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
16
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
17
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
18
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
19
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
20
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?

पहिल्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अटीत वेळोवेळी बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST

केशोरी : शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट सहावर्षे ऐवजी पाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांना अडचण निर्माण ...

केशोरी : शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट सहावर्षे ऐवजी पाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांना अडचण निर्माण केली आहे. ३० सप्टेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देण्याची प्रचलित पद्धत होती. आता ती मुदत ३१ डिसेंबर वाढवून दिल्याचे शासन निर्णय जारी झाल्याने प्रवेशाचा गोंधळ निर्माण झाला आहे.

आरटीई कायद्यानुसार मोफत शिक्षणाच्या अधिन राहून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेशित विद्यार्थी समजून प्रवेश देण्यात यावा, असे यापूर्वीचे आदेश होते. परंतु या पूर्व आदेशाला राज्याच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागाने रद्द केले. सहा वर्षाच्या निकषात बदल करून त्या ऐवजी साडेपाच वर्षे वयाच्या प्रवेशित बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले आहे. यामुळे शाळेच्या पटसंख्येत थोडीफार वाढ होईल. परंतु पुढील वर्षी यावर्षीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना साडेसहा वर्षे पूर्ण होतील आणि आरटीई कायद्याच्या अधिन राहून इयत्ता पहिलीऐवजी सरळ दुसऱ्या वर्गात प्रवेश द्यावा लागणार आहे. अशावेळी महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्यात जन्म झालेला बाळ दुसऱ्या वर्गात असेल अशी स्थिती निर्माण होऊन शालेय शिक्षण विभागाच्या गोंधळात गोंधळ वाढला आहे. त्यामुळे पालकांमध्ये सुध्दा संभ्रम निर्माण झाला आहे.