शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

केंद्र सरकारने प्रतिदिन एक कोटी लसीकरण सुनिश्चित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशाला हादरवून सोडले आहे. दररोज सरासरी चार लाखांच्यावर लोक बाधित होत होते व ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशाला हादरवून सोडले आहे. दररोज सरासरी चार लाखांच्यावर लोक बाधित होत होते व चार हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडत होते. केंद्र सरकारने लसीकरणाची व्यवस्था वेळेच्या आत केली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते. आजही लसीकरणाला पाहिजे तशी गती नसून देशाला तिसऱ्या लाटेपासून वाचवायचे असल्यास केंद्र सरकारने प्रतिदिन एक कोटी लसीकरण सुनिश्चित करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे.

लसीकरणात करण्यात आलेली अक्षम्य दिरंगाई देशाला दुसऱ्या लाटेत भोवली. लसीकरणात देशात सुसूत्रता नसणे व शेवटी केंद्राकडून झालेल्या अव्यवस्थेमुळे लसीकरणाची जवाबदारी राज्यांवर सोपविण्यात आली. केंद्र सरकारने लस मोफत न देता केंद्र सरकारसाठी प्रति लस १५० रुपये, राज्यांसाठी ३०० रुपये व खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये अशी वेगवेगळी किंमत ठरविली. त्यामुळे देशात लसीकरणाबाबत गोंधळ उडाल्याचे दिसून येते. जेथे अनेक देशांनी मे २०२० मध्येच लसींची खरेदी ऑर्डर कंपन्यांना दिली. तेथेच मोदी सरकारने लस खरेदीबद्दल कोणतीही कार्यवाही केली नाही व जानेवारी २०२१ मध्ये पहिली खरेदी ऑर्डर दिली. त्यामुळे लसीकरणास दिरंगाई झाली. त्यातच सरकारने ६.६३ कोटी लसींचे डोस एकूण ९५ देशांमध्ये निर्यात केले. केंद्र सरकाने ३१ मे २०२१ पर्यंत फक्त २१.३१ कोटी लसीकरण केले आहे. लसींचे दोन्ही डोज फक्त ४.४५ कोटी भारतीयांनाच लागले असून जे एकूण लोकसंख्येच्या ३.१७ टक्के आहे. जर देशाला कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटे पासून वाचवायचे असेल तर झपाट्याने लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज सरासरी एक कोटी लोकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद आहे. शिष्टमंडळात काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, युवा नेता अशोक गुप्ता, जहीर अहमद, सूर्यप्रकाश भगत, राजकुमार पटले उपस्थित होते.

---------------------------

सर्वच वयोगटांचे लसीकरण करा

कोरोनापासून सर्वांनाच सुरक्षा द्यावयाची असल्याने सर्वांनाच लस देणे गरजेचे आहे. मात्र सध्या ४५ वर्षे वयोगटावर लसीकरण सुरू आहे. मात्र आता केंद्र सरकाने कोणतेही शुल्क न आकारता संबंध देशात सर्वच वयोगटांतील जनतेला लसीकरण करावे. तसेच राज्यांना निशुल्क लसींचा पुरवठा केंद्राने राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात करावा, अशी मागणी कॉंग्रेस कमिटीने केली आहे.