शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

केंद्र सरकारने प्रतिदिन एक कोटी लसीकरण सुनिश्चित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशाला हादरवून सोडले आहे. दररोज सरासरी चार लाखांच्यावर लोक बाधित होत होते व ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशाला हादरवून सोडले आहे. दररोज सरासरी चार लाखांच्यावर लोक बाधित होत होते व चार हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडत होते. केंद्र सरकारने लसीकरणाची व्यवस्था वेळेच्या आत केली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते. आजही लसीकरणाला पाहिजे तशी गती नसून देशाला तिसऱ्या लाटेपासून वाचवायचे असल्यास केंद्र सरकारने प्रतिदिन एक कोटी लसीकरण सुनिश्चित करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे.

लसीकरणात करण्यात आलेली अक्षम्य दिरंगाई देशाला दुसऱ्या लाटेत भोवली. लसीकरणात देशात सुसूत्रता नसणे व शेवटी केंद्राकडून झालेल्या अव्यवस्थेमुळे लसीकरणाची जवाबदारी राज्यांवर सोपविण्यात आली. केंद्र सरकारने लस मोफत न देता केंद्र सरकारसाठी प्रति लस १५० रुपये, राज्यांसाठी ३०० रुपये व खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये अशी वेगवेगळी किंमत ठरविली. त्यामुळे देशात लसीकरणाबाबत गोंधळ उडाल्याचे दिसून येते. जेथे अनेक देशांनी मे २०२० मध्येच लसींची खरेदी ऑर्डर कंपन्यांना दिली. तेथेच मोदी सरकारने लस खरेदीबद्दल कोणतीही कार्यवाही केली नाही व जानेवारी २०२१ मध्ये पहिली खरेदी ऑर्डर दिली. त्यामुळे लसीकरणास दिरंगाई झाली. त्यातच सरकारने ६.६३ कोटी लसींचे डोस एकूण ९५ देशांमध्ये निर्यात केले. केंद्र सरकाने ३१ मे २०२१ पर्यंत फक्त २१.३१ कोटी लसीकरण केले आहे. लसींचे दोन्ही डोज फक्त ४.४५ कोटी भारतीयांनाच लागले असून जे एकूण लोकसंख्येच्या ३.१७ टक्के आहे. जर देशाला कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटे पासून वाचवायचे असेल तर झपाट्याने लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज सरासरी एक कोटी लोकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद आहे. शिष्टमंडळात काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, युवा नेता अशोक गुप्ता, जहीर अहमद, सूर्यप्रकाश भगत, राजकुमार पटले उपस्थित होते.

---------------------------

सर्वच वयोगटांचे लसीकरण करा

कोरोनापासून सर्वांनाच सुरक्षा द्यावयाची असल्याने सर्वांनाच लस देणे गरजेचे आहे. मात्र सध्या ४५ वर्षे वयोगटावर लसीकरण सुरू आहे. मात्र आता केंद्र सरकाने कोणतेही शुल्क न आकारता संबंध देशात सर्वच वयोगटांतील जनतेला लसीकरण करावे. तसेच राज्यांना निशुल्क लसींचा पुरवठा केंद्राने राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात करावा, अशी मागणी कॉंग्रेस कमिटीने केली आहे.