शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने सात वर्षांत जनतेला केवळ महागाईची भेट दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

गोंदिया : खोटे आणि मोठे बोलून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मागील सात वर्षांच्या काळात जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे ...

गोंदिया : खोटे आणि मोठे बोलून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मागील सात वर्षांच्या काळात जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर दरात प्रचंड वाढ करून जनतेला महागाईची भेट देण्यापलीकडे काहीच केले नाही. केवळ समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यापलीकडे काहीच केले नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे प्रतिपादन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. माजी आ. जैन म्हणाले, मोदी सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. मात्र हे आश्वासनसुद्धा हवेतच विरले. धानाच्या हमीभावात केंद्र सरकारने केवळ ७८ रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. केंद्र सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. याउलट राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले. कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात असतानासुद्धा धानाला ७०० रुपये बोनस दिला. खा. प्रफुल्ल पटेल यांनी कोरोना संक्रमण असताना दोन्ही जिल्ह्यांना ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला. तसेच दोन्ही जिल्ह्यांतील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारामुळे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. त्यामुळेच ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यास मदत झाली. दोन्ही जिल्ह्यांतील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी आ. राजेंद्र जैन यांनी दिली.