शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

राजकारणात अडकले जनावरांचे गोठे

By admin | Updated: June 25, 2016 01:42 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनुज्ञेय शेळ्यांचा गोठा व इतर पाळीव जनावरांच्या पशुसंवर्धनाकरिता गोठा तयार करण्यासाठी ....

शेतकरी चिंतेत : पं.स. सभापती राजकारण करीत असल्याचा आरोपकालीमाटी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनुज्ञेय शेळ्यांचा गोठा व इतर पाळीव जनावरांच्या पशुसंवर्धनाकरिता गोठा तयार करण्यासाठी योजना कार्यान्वित आहे. पण आमगाव पं.स.मध्ये राजकारण शिरत असून शासन मंजूर लाभार्थ्यांची यादी रद्द केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.पंचायत समिती आमगाव येथे शासन परिपत्रक (मग्रारोहयो २०१२/प्र.क्र. ३६/रोहयो १ दि. ९ आॅक्टोबर १२) नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनुसार शेतकऱ्यांना पाळीव जनावरांच्या संवर्धनाचे गोठे तयार करुन देण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावरुन यादी मंजूर केली. पण पं.स. आमगाव येथे १० जूनला पं.स. सदस्यांना मिळालेल्या पत्रानुसार मंजूर कामे रद्द करण्याचे फरमान देण्यात आले. सदर कामे शासन निकषानुसार नसल्याचे कारण दाखवित या प्रकरणी पं.स. येथील कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आले. गोठे तयार करताना ग्रामपंचायतीत प्रत्येकी पाच कामे करावीत, पण नियोजनात कमी जास्त कामे मंजूर झाल्याने १५ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी सभापती व सदस्यांनी सदर मुद्दा रेटून धरला.पण शासन परित्रकाद्वारे ४०/६० कार्यांतर्गत ज्या ग्रामपंचायतने मोठ्या प्रमाणात मातीचे कार्य केले, त्यांना ५० ते १०० गोठे मंजूर व्हावे. परंतु सभापती व उपसभापतींच्या राजकीय पैलूंमुळे शेतकरी हिताचे कार्य बंद पाडण्याच्या विचारात दिसतात, असा आरोप पं.स. सदस्य प्रमोद शिवणकर यांनी केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधी अंतर्गत गोठे २०१२ च्या शासन निर्णयाप्रमाणे करायचे होते. परंतु आजपर्यंत ही योजना कागदोपत्रीच खेळली गेली. पण जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी जि.प.च्या स्थायी समितीच्या सभेत मुद्दा उपस्थित करुन शेतकरी हिताचा हा प्रश्न मार्गी लावला.६ मे २०१६ चे उपकार्यपालन अधिकारी, मग्रारोहयो यांच्या पत्रानुषंगाने शेळी व गायीचे गोठे संवर्धनासाठी शेड मंज़ुरीचे मार्ग आमगाव तालुक्यासाठी मोकळे झाले. या संदर्भात जि.प. सदस्य सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती यांनी पाठपुरावा करुन शेतकऱ्यांसाठी प्रशासनाला हतबल केले. पण सभापती व उपसभापती, भाजप व काँग्रेस असे एका ताटात असून आपल्या मताप्रमाणे कामे वाटप करण्यात यावी, यासाठी मंजूर कामे रद्द केल्याचा आरोप राकाँपाच्या सदस्यांनी केला आहे. या प्रकरणी राकाँपाच्या सदस्यांनी पाठपुरावा करुन सदर योजनेला आॅक्सिजन दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पोटात दुखत असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या हितायोग्य अनेक योजना कार्यान्वित असतात. पण पक्ष व स्वार्थ जिथे येतो त्यावेळी सर्वप्रथम पोशिंद्याचा बळी जातो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर गोठे मंजूर असून शासन निर्णयानुसार त्वरित कामे सुरू करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य डॉ. जशवंत बावनकर, दरविला मडावी, वंदना बोरकर, सिंधूताई भुते, प्रमोद शिवणकर यांनी केली आहे. (वार्ताहर)शेळी व गाईच्या गोठ्यांना मंजुरी मिळाली असली तरी ती यादी नियमबाह्य आहे. शासन नियमाप्रमाणे प्रत्येक गावातून अपंग, अनुस;चित जाती-जमाती व इतर राखीव कमकुवत शेतकरी वर्गासाठी प्राधान्य रीहावे. तसेच सदर मंजूर यादी कर्मचारी वर्गाने शासनास लाभार्थी म्हणून यादी पाठविली, पण ही यादी सभेत मंजूर करण्यात आली नाही. सचिवाने ग्रामपंचायत स्तरावरुन योग्यरित्या राखीव पदांना प्राधान्य देऊन पं.स. कार्यालयात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. -हेमलता डोये, सभापती पंचायत समिती