शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

कमी मनुष्य बळातही मार्गी लावली जात आहे प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST

गोंदिया : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि वेगवेगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणी समितीकडे मोठ्या प्रकरणे दाखल ...

गोंदिया : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि वेगवेगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणी समितीकडे मोठ्या प्रकरणे दाखल केली जातात. मागील दोन महिने या समितीवर ग्रामपंचायत निवडणुकीमुळे प्रचंड व्याप वाढला होता. त्यामुळे हे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवून ही सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विभागात आधीच कमी मनुष्यबळ मंजूर आहे. त्यातच या विभागात सहा ते सात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पण या स्थिती सुध्दा प्रकरणे प्रलंबित न ठेवता ती त्वरीत मार्गी लावली जात असल्याने प्रलंबित प्रकरणाची संख्या फार कमी आहे. येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे दररोज शंभराहून अधिक प्रकरणे दाखल केली जातात. तर दररोज ६० ते प्रकरणे मार्गी लावली जातात. तर महिन्याकाठी १२०० प्रकरणे दाखल होतात. सध्या शाळा महाविद्यालये सुरु होत असल्याने शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे या विभागात सध्या कामासाठी विद्यार्थी आणि नागरिकांची गर्दी वाढली आहे.

.......

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे साधारण रोज दाखल होणारी प्रकरणे - १००

एका महिन्यात दाखल प्रकरणे -१२००

रोज निकाली निघणारी प्रकरणे -६० ते ७०

प्रलंबित प्रकरणे - २००

......

कमी पदे मंजूर असल्याने अडचण

जिल्हा जात पडताळणी समितीसाठी शासनाने पूर्वीच कमी पदे मंजूर केली आहे. या विभागातील कामाच्या व्यापानुसार पदे मंजूर नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण जास्त आहे. वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांची पाच ते सहा पदे रिक्त आहेत. ही पदे अद्यापही भरण्यात आली नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक येतो.

......

एका प्रकरणासाठी लागतो दोन तासांचा वेळ

जात पडताळणी समितीकडे येणाऱ्या प्रकरणाला एकूण तीन टप्प्यातून जावे लागते. समितीच्या अध्यक्षांची प्रकरणावर स्वाक्षरी झाल्यानंतर हे प्रकरण मार्गी लावले जाते. साधारणपणे एक प्रकरण मार्गी लावण्यासाठी किमान दोन तासांचा कालावधी लागतो. अध्यक्षांकडे पाच ते सहा जिल्ह्यांची जबाबदारी असल्याने त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला दिवस वाटून दिले आहे. गोंदिया येथे ते सोमवारी असतात यावेळी ते अधिकाधिक प्रकरणे मार्गी लावत असल्याची माहिती आहे.

......

१२०० वर प्रकरणे दाखल

जिल्हा जात पडताळणी विभागाकडे सध्या स्थितीत हजारावर प्रकरणे दाखल आहेत. तर या विभागात सध्या स्थितीत सात अधिकारी कर्मचारी कार्यरत आहे. कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कामाचा ताण अधिक आहे. मात्र यानंतरही दररोज ७० ते ८० प्रकरणे मार्गी लावली जात असल्याची माहिती आहे.

....

कोट :

मुलाच्या पुढील उच्च शिक्षणासाठी मी जातपडताळणी विाभागाकडे पंधरा दिवसांपूर्वी अर्ज केला आहे. पण अजूनही माझे प्रकरण मार्गी लागायचे आहे. प्रकरण मार्गी लागल्यास पुढील काम करण्यास मदत होईल.

- सोमाजी बांबोडे, दासगाव

......

जात पडताळणी समितीकडे येणारी प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय कोणतेही प्रकरण प्रलंबित राहू नये यासाठी आम्ही काळजी घेतो. अर्जांमध्ये त्रुट्या नसल्यास प्रकरणे त्वरीत मार्गी लावली जातात. त्रुट्यांमुळेच प्रकरण मार्गी लागण्यास वेळ लागतो. -

देवसूदन धारगावे, उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती.