शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

गोंदिया : मान्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश ...

गोंदिया : मान्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक सोमवारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सभेत विषयांचे सादरीकरण आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

जिल्हाधिकारी मीना म्हणाले, १ जूनपासून मान्सूनचा कालावधी सुरू होणार आहे. सर्वच विभागांनी नैसर्गिक आपत्तीचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये पूरस्थितीचे संभाव्य धोके आहेत. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमध्ये उपाययोजना करण्यासंबंधी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. धान्यसाठा, औषधसाठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध असल्यास नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यास सोईस्कर होईल. नगर परिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत यांना त्यांच्या क्षेत्रात असलेल्या नाले, नालीसफाईचे काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य साथ आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. पर्जन्यमानाची आकडेवारी सर्व तालुक्यात दररोज अद्ययावत करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या. जलसंपदा व महसूल विभाग यांनी योग्य समन्वय ठेवून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतीची मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करून वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे धरण, जलाशये, तलाव तसेच धोक्याच्या ठिकाणी कुणीही सेल्फी घेताना किंवा गर्दी करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील तालुका, नगर परिषद, नगरपंचायत, प्रभाग, वाॅर्ड आणि ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करावी. जेणेकरून पूर परिस्थितीत ग्रामपातळीपर्यंत समन्वय साधला जाऊ शकेल, तसेच पूरस्थितीत जीवित व वित्तीयहानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

.......

धोक्याच्या ठिकाणी रेडियमचे फलक लावा

जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता यांना धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी सर्व संबंधितांना सूचना देण्याबाबत, पोलीस विभागाला पाण्याखाली बुडालेले रस्ते, पूल या ठिकाणी बॅरिकेड लावून बंदोबस्त करण्याबाबत, पुरवठा विभागाला पूरप्रवण गावात धान्याचा साठा उपलब्ध करण्याबाबत, विद्युत विभागाला मान्सूनपूर्व विद्युततारांवरील झाडांच्या खांद्या कापणे, कार्यकारी

अभियंता बाघ इटियाडोह यांना धोक्याच्या ठिकाणांवर रेडीयमचे फलक लावण्याबाबत, आरोग्य विभागाला सर्व आरोग्य केंद्रात औषधांचा पर्याप्त साठा उपलब्ध ठेवण्याबाबतचे निर्देश मीना यांनी दिले.