शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

त्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST

परसवाडा : महाविकास आघाडी सरकारने सूडभावनेतून केलेले १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली ...

परसवाडा : महाविकास आघाडी सरकारने सूडभावनेतून केलेले १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. यासाठी भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. ६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यानंतर विविध मागण्यांचे तहसीलदार प्रशांत घोरूडे यांना देण्यात आले.

ओबीसी समाजाला त्याचे रद्द झालेले आरक्षण राज्य सरकारने त्वरित परत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभागृहात मांडली होती. १२ आमदारांनी हा विषय रेटून धरल्याने महाविकास आघाडी सरकारची गोची झाली. विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात चर्चा न होऊ देता १२ आमदारांना निलंबित केले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आमदारांनी कोणत्याही प्रकारची शिवीगाळ,गैरवर्तन, अपमानास्पद वागणूक केली नसल्याचे स्पष्ट झाले. तरी सरकारने सूडभावनेतून त्यांचे निलंबन केले. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकाचा निषेध नोंदवित मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. १२ आमदाराचे निलंबन रद्द करण्यात यावे, सरकारने ओबीसी आयोगाचे गठन करून व एम्पेरीयल डेटा गोळा करून व सर्वोच्च न्यायालयात सादर करून रद्द झालेले ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून द्यावे. आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत सरकारने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये या मागण्यांचे निवेदन तहसीलदार घोरुडे यांना भाजपच्या दवनीवाडा मडंळच्या वतीने देण्यात आले. यावेळी भाऊराव कठाणे, स्वानंद पारधी, धनेंद्र अटरे, सोनाली देशपांडे, माधुरी राहंगडाले, रानी बालकोठे, ओम कटरे, डॉ. चिंतामन राहंगडाले, मदन पटले, डॉ. बसंत भगत, रजनी कुंभरे, तुमेश्वरी बघेले, शशीकला मेश्राम, मेघा बिसेन, मीनाक्षी ठाकरे, तेजराम चव्हाण, चतुर्भुज बिसेन, कैलाश गौतम, राजेश मलघाटे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.