शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

‘त्या’ मृत पक्ष्यांचा दफनविधी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST

अर्जुनी मोरगाव : बोडगाव सुरबनच्या शृंगारबांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या दोन विदेशी पक्ष्यांचा शुक्रवारी वनविभागाने दफनविधी केला. मृत पक्षी कुजलेल्या ...

अर्जुनी मोरगाव : बोडगाव सुरबनच्या शृंगारबांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या दोन विदेशी पक्ष्यांचा शुक्रवारी वनविभागाने दफनविधी केला. मृत पक्षी कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. अळ्या लागल्या असल्याने त्यांचे अवयव फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविता येऊ शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शृंगारबांध तलावात दोन विदेशी पक्ष्यांचा मृत्यू या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने सर्वप्रथम शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच वनविभाग खळबळून जागे झाले. गोठणगावच्या वनपरिक्षेत्राधिकारी दर्शना पाटील यांनी शुक्रवारी सकाळी सहकारी कर्मचाऱ्यांसह तलावाला भेट दिली. त्यांना दोन विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळून आले. मात्र, हे पक्षी कुजक्या व सडलेल्या अवस्थेत होते. पक्ष्यांना अळ्या लागल्या होत्या. नी पंचनामा केला. केशोरीचे पशुसंवर्धन पर्यवेक्षक बडोले सोबत होते. मृत पक्ष्यांच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यासारखे नव्हते. त्यामुळे या विदेशी पक्ष्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, ते कळायला मार्ग नाही. बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. एक लहान तर दुसरा कोंबड्याच्या आकाराचा असे दोन मृत पक्षी असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय नियमाप्रमाणे त्यांना जमिनीत खड्डा तयार करून पुरण्यात आले. संसर्ग टाळण्यासाठी जमिनीत पुरताना कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेतली होती. तलावातील इतर पक्ष्यांवर देखरेख ठेवण्यासाठी शुक्रवारी दुपारी वन कर्मचाऱ्यांचे आणखी एक पथक तलावाकडे जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. मृत पक्ष्यांना जमिनीत पुरतेवेळी वनपरिक्षेत्राधिकारी दर्शना पाटील, पशुधन पर्यवेक्षक बडोले, क्षेत्र सहायक डी.एम. बुरेले, वनरक्षक हटवार, देशमुख, मुंडे, वनमजूर उपस्थित होते.

......

पक्ष्यांच्या मृत्यूचे रहस्य कायम

मृत पक्ष्यांवर सोपस्कार पार पडले असले तरी त्यांचा मृत्यू हा नेमका कशामुळे झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पक्ष्यांचा मृत्यू हा चार ते पाच दिवसांपूर्वीच झाला असण्याची शक्यता आहे. यापूर्वी गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेली एकमेव सारस जोडी कीटकनाशक औषधयुक्त धानबिया खाल्ल्याने मृत्युमुखी पडली होती. त्यांचाही वावर याच परिसरात होता. असले प्रकार घडत असताना शासकीय यंत्रणा निद्रावस्थेत होती काय, असा प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे. याविषयी पक्षिप्रेमींनीही खंत व्यक्त केली.