शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ पैसा नव्हे प्रतिबंधात्मक लसच येणार कामी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस घेऊन दुसरा डोस टोलवत असल्याने फक्त १६ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे दिसत आहे. मात्र हा प्रकार अनुचित असून, दुसऱ्या लाटेने पैसा नाही तर कोरोनाची लस कामी आल्याचे दाखवून दिले आहे.

देशात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या हाती काहीच नव्हते व कित्येकांचा कोरोनाने जीव घेतला. मात्र याहीपेक्षा खेदाची बाब म्हणजे, दुसरी लाट आली तेव्हा अवघ्या देशातच कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली होती. मात्र लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने कोरोनाला आपले पाय पसरायला संधी मिळाली. यामुळेच पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिकच धोक्याची ठरली. यानंतर शास्त्रज्ञांनी कोरोनाला पाय पसरू द्यायचे नसल्यास लवकरात लवकर लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर लसीकरणाला अधिक गती देण्यात आली असून, लसीकरण जोमात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कहर बघता नागरिकांनी लसीकरणासाठी धावपळ सुरू केली व ती सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६७.६१ टक्के लसीकरण झाले आहे, यात ८,७८,६८३ नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये ५०.८३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्यांची ६,६०,६५७ एवढी संख्या आहे. तर फक्त १६.७८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्यांची संख्या २,१८,०२६ एवढी आहे. यावरून नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने पहिला डोस घेतला व आता दुसरा डोस घेण्यासाठी त्यांची टोलवाटोलवी सुरू आहे.

----------------------------------

तिसरी लाट नको असल्यास दुसरा डोस घ्या

दुसऱ्या लाटेतील कहर आजही धडकी भरवणारा असून, त्याच भीतीने नागरिकांनी लसीकरणासाठी धाव घेतली होती. यात त्यांनी पहिला डोस घेतला व त्यानंतर आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने ‘आता कोरोनाच नाही तर डोसची काय गरज’ अशा संभ्रमात नागरिक वावरत आहेत. मात्र, दोन्ही डोस घेतल्याशिवाय कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नसल्याचे कित्येक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शिवाय नोव्हेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. याकरिता ऑक्टोबरमध्येच दुसरा डोस घेणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

-----------------------------

दुसऱ्या लाटेतून मिळाली शिकवण

दुसऱ्या लाटेत कित्येकांना गंभीर स्थितीत दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली. मात्र त्यानंतरही त्यांचा जीव गेला. यात कित्येक धनाढ्यांचाही समावेश असून, पैसा असतानाही त्यांना वाचवता आले नाही. तोच ज्यांनी लस घेतली होती, त्यांना कोरोना गंभीर स्थितीपर्यंत नेऊ शकला नाही, हे अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे. यामुळे दुसऱ्या लाटेने आजच्याघडीला पैसा नाही तर फक्त लस कामी येणार असल्याचे दाखवून दिले आहे. याकरिता लवकरात लवकर लसीकरण हाच कोरोनाला मात देण्याचा रामबाण इलाज आहे.