शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

भाऊ पैसा नव्हे प्रतिबंधात्मक लसच येणार कामी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस घेऊन दुसरा डोस टोलवत असल्याने फक्त १६ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे दिसत आहे. मात्र हा प्रकार अनुचित असून, दुसऱ्या लाटेने पैसा नाही तर कोरोनाची लस कामी आल्याचे दाखवून दिले आहे.

देशात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या हाती काहीच नव्हते व कित्येकांचा कोरोनाने जीव घेतला. मात्र याहीपेक्षा खेदाची बाब म्हणजे, दुसरी लाट आली तेव्हा अवघ्या देशातच कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली होती. मात्र लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने कोरोनाला आपले पाय पसरायला संधी मिळाली. यामुळेच पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिकच धोक्याची ठरली. यानंतर शास्त्रज्ञांनी कोरोनाला पाय पसरू द्यायचे नसल्यास लवकरात लवकर लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर लसीकरणाला अधिक गती देण्यात आली असून, लसीकरण जोमात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कहर बघता नागरिकांनी लसीकरणासाठी धावपळ सुरू केली व ती सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६७.६१ टक्के लसीकरण झाले आहे, यात ८,७८,६८३ नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये ५०.८३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्यांची ६,६०,६५७ एवढी संख्या आहे. तर फक्त १६.७८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्यांची संख्या २,१८,०२६ एवढी आहे. यावरून नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने पहिला डोस घेतला व आता दुसरा डोस घेण्यासाठी त्यांची टोलवाटोलवी सुरू आहे.

----------------------------------

तिसरी लाट नको असल्यास दुसरा डोस घ्या

दुसऱ्या लाटेतील कहर आजही धडकी भरवणारा असून, त्याच भीतीने नागरिकांनी लसीकरणासाठी धाव घेतली होती. यात त्यांनी पहिला डोस घेतला व त्यानंतर आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने ‘आता कोरोनाच नाही तर डोसची काय गरज’ अशा संभ्रमात नागरिक वावरत आहेत. मात्र, दोन्ही डोस घेतल्याशिवाय कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नसल्याचे कित्येक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शिवाय नोव्हेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. याकरिता ऑक्टोबरमध्येच दुसरा डोस घेणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

-----------------------------

दुसऱ्या लाटेतून मिळाली शिकवण

दुसऱ्या लाटेत कित्येकांना गंभीर स्थितीत दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली. मात्र त्यानंतरही त्यांचा जीव गेला. यात कित्येक धनाढ्यांचाही समावेश असून, पैसा असतानाही त्यांना वाचवता आले नाही. तोच ज्यांनी लस घेतली होती, त्यांना कोरोना गंभीर स्थितीपर्यंत नेऊ शकला नाही, हे अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे. यामुळे दुसऱ्या लाटेने आजच्याघडीला पैसा नाही तर फक्त लस कामी येणार असल्याचे दाखवून दिले आहे. याकरिता लवकरात लवकर लसीकरण हाच कोरोनाला मात देण्याचा रामबाण इलाज आहे.