शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

भाऊ पैसा नव्हे, प्रतिबंधात्मक लसच येणार कामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस घेऊन दुसरा डोस ...

गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस घेऊन दुसरा डोस टोलवत असल्याने फक्त १६ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे दिसत आहे. मात्र, हा प्रकार अनुचित असून, दुसऱ्या लाटेने पैसा नाही, तर कोरोनाची लस कामी आल्याचे दाखवून दिले आहे.

देशात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या हाती काहीच नव्हते व कित्येकांचा कोरोनाने जीव घेतला. मात्र, याहीपेक्षा खेदाची बाब म्हणजे, दुसरी लाट आली तेव्हा अवघ्या देशातच कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने कोरोनाला आपले पाय पसरायला संधी मिळाली. यामुळेच पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिकच धोक्याची ठरली. यानंतर शास्त्रज्ञांनी कोरोनाला पाय पसरू द्यायचे नसल्यास लवकरात लवकर लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर लसीकरणाला अधिक गती देण्यात आली असून, लसीकरण जोमात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कहर बघता नागरिकांनी लसीकरणासाठी धावपळ सुरू केली व ती सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६७.६१ टक्के लसीकरण झाले आहे, यात ८,७८,६८३ नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये ५०.८३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्यांची ६,६०,६५७ एवढी संख्या आहे, तर फक्त १६.७८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्यांची संख्या २,१८,०२६ एवढी आहे. यावरून नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने पहिला डोस घेतला व आता दुसरा डोस घेण्यासाठी त्यांची टोलवाटोलवी सुरू आहे.

—————————————————

तिसरी लाट नको असल्यास दुसरा डोस घ्या

दुसऱ्या लाटेतील कहर आजही धडकी भरवणारा असून, त्याच भीतीने नागरिकांनी लसीकरणासाठी धाव घेतली होती. यात त्यांनी पहिला डोस घेतला व त्यानंतर आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने ‘आता कोरोनाच नाही, तर डोसची काय गरज’ अशा संभ्रमात नागरिक वावरत आहेत. मात्र, दोन्ही डोस घेतल्याशिवाय कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नसल्याचे कित्येक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शिवाय नोव्हेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. याकरिता ऑक्टोबरमध्येच दुसरा डोस घेणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

——————————————-

दुसऱ्या लाटेतून मिळाली शिकवण

दुसऱ्या लाटेत कित्येकांना गंभीर स्थितीत दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली. मात्र, त्यानंतरही त्यांचा जीव गेला. यात कित्येक धनाढ्यांचाही समावेश असून, पैसा असतानाही त्यांना वाचवता आले नाही. मात्र, ज्यांनी लस घेतली होती, त्यांना कोरोना गंभीर स्थितीपर्यंत नेऊ शकला नाही, हे अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे. यामुळे दुसऱ्या लाटेने आजघडीला पैसा नाही, तर फक्त लस कामी येणार असल्याचे दाखवून दिले आहे. याकरिता लवकरात लवकर लसीकरण हाच कोरोनाला मात देण्याचा रामबाण इलाज आहे.