शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

भाऊ पैसा नव्हे, प्रतिबंधात्मक लसच येणार कामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस घेऊन दुसरा डोस ...

गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस घेऊन दुसरा डोस टोलवत असल्याने फक्त १६ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे दिसत आहे. मात्र, हा प्रकार अनुचित असून, दुसऱ्या लाटेने पैसा नाही, तर कोरोनाची लस कामी आल्याचे दाखवून दिले आहे.

देशात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या हाती काहीच नव्हते व कित्येकांचा कोरोनाने जीव घेतला. मात्र, याहीपेक्षा खेदाची बाब म्हणजे, दुसरी लाट आली तेव्हा अवघ्या देशातच कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने कोरोनाला आपले पाय पसरायला संधी मिळाली. यामुळेच पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिकच धोक्याची ठरली. यानंतर शास्त्रज्ञांनी कोरोनाला पाय पसरू द्यायचे नसल्यास लवकरात लवकर लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर लसीकरणाला अधिक गती देण्यात आली असून, लसीकरण जोमात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कहर बघता नागरिकांनी लसीकरणासाठी धावपळ सुरू केली व ती सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६७.६१ टक्के लसीकरण झाले आहे, यात ८,७८,६८३ नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये ५०.८३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्यांची ६,६०,६५७ एवढी संख्या आहे, तर फक्त १६.७८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्यांची संख्या २,१८,०२६ एवढी आहे. यावरून नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने पहिला डोस घेतला व आता दुसरा डोस घेण्यासाठी त्यांची टोलवाटोलवी सुरू आहे.

—————————————————

तिसरी लाट नको असल्यास दुसरा डोस घ्या

दुसऱ्या लाटेतील कहर आजही धडकी भरवणारा असून, त्याच भीतीने नागरिकांनी लसीकरणासाठी धाव घेतली होती. यात त्यांनी पहिला डोस घेतला व त्यानंतर आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने ‘आता कोरोनाच नाही, तर डोसची काय गरज’ अशा संभ्रमात नागरिक वावरत आहेत. मात्र, दोन्ही डोस घेतल्याशिवाय कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नसल्याचे कित्येक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शिवाय नोव्हेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. याकरिता ऑक्टोबरमध्येच दुसरा डोस घेणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

——————————————-

दुसऱ्या लाटेतून मिळाली शिकवण

दुसऱ्या लाटेत कित्येकांना गंभीर स्थितीत दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली. मात्र, त्यानंतरही त्यांचा जीव गेला. यात कित्येक धनाढ्यांचाही समावेश असून, पैसा असतानाही त्यांना वाचवता आले नाही. मात्र, ज्यांनी लस घेतली होती, त्यांना कोरोना गंभीर स्थितीपर्यंत नेऊ शकला नाही, हे अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे. यामुळे दुसऱ्या लाटेने आजघडीला पैसा नाही, तर फक्त लस कामी येणार असल्याचे दाखवून दिले आहे. याकरिता लवकरात लवकर लसीकरण हाच कोरोनाला मात देण्याचा रामबाण इलाज आहे.