शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

तिरोडा परिसराच्या विकासाला ‘ब्रेक’

By admin | Updated: December 13, 2015 01:52 IST

गेल्या सहा वर्षापूर्वी तिरोडा तालुका व एकूणच विधानसभा क्षेत्रात विकासाच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल...

दिलीप बन्सोड यांचा सवाल : सहा वर्षात नवीन काय मिळाले?गोंदिया : गेल्या सहा वर्षापूर्वी तिरोडा तालुका व एकूणच विधानसभा क्षेत्रात विकासाच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल आणि गेल्या पाच-सहा वर्षाचा कार्यकाळ याची तुलना केल्यास या क्षेत्रातील स्थिती मोठी निराशाजनक अशीच दिसत आहे. कोणताही नवीन प्रकल्प नाही, शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळण्यासाठी नियोजन नाही, पुनर्वसनग्रस्तांकडे कोणी लक्ष देत नाही, शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. अशात निसर्गाचीही या परिसरावर वक्रदृष्टी आहे. अशा भकास झालेल्या वातावरण सामान्य माणसात जगण्याची आशा निर्माण करण्यासाठी कोणी पुढाकार घेणार का, असा सवाल माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता दिलीप बन्सोड यांनी उपस्थित केला.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बन्सोड यांनी तिरोडा परिसरातील एकूणच विकासात्मक कामांचे अलिकडील चित्र निराशाजनक असल्याचे मत व्यक्त केले.राज्यातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आपल्या भागात आला. त्यामुळे विकासाला गती मिळाली असे वाटत नाही का? यावर बोलताना माजी आ.बन्सोड म्हणाले, निश्चितच अदानी प्रकल्पामुळे हा भाग राज्यातच नाही तर देशाच्या नकाशावर आला आहे. पण हा प्रकल्प ६ वर्षापूर्वी खा.प्रफुल्ल पटेलांनी या भागात खेचून आणला. बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासोबतच परिसरात कायापालट करण्याचे स्वप्न होते. धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांतीचे स्वप्न त्यावेळी आम्ही पाहिले होते. पण गेल्या सहा वर्षात या विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी पेलण्यात कमी पडले. त्यामुळेच त्यावेळी आम्ही रंगविलेल्या स्वप्नांचे अपेक्षित फळ मिळाल्याचे दिसून येत नाही, अशी खंत बन्सोड यांनी व्यक्त केली.केवळ तिरोडा शहराचा विकास म्हणजे विकास नाही. या विधानसभा मतदार संघातील १३९ गावांची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींची असते. या गावात सहा वर्षांपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आजही आहे. रस्ते, पाणी, सिंचन, वीज या समस्या किती सोडविण्यात आल्या? सहा वर्षापूर्वी विकासाचा वेग ज्या पद्धतीने सुरू झाला होता त्या तुलनेत गेल्या पाच वर्षात २० टक्केही कामे झाली नाहीत्त हे कटू सत्य असल्याचे बन्सोड म्हणाले.जिल्ह्याचे चित्र बदलवू शकणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी संग्रामपूर आणि खैरबंदा जलाशयात टाकण्यासाठीची पाईपलाईन गेल्या पाच वर्षापासून पूर्ण होऊ शकली नाही, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. तालुक्यातील आंबेनाला जलाशयाची मंजुरी मी आमदार असताना मिळाली. त्यावेळी १० कोटी रुपये फक्त मालमत्ता कराचे भरले. मात्र केवळ ४ कोटी रुपयांसाठी ही योजना ६ वर्षांपासून रखडली आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आणवारी पद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. नैसर्गिक संकटात दिलासा देण्यासाठी पिक अपघाती विमा लागू करावा, अशीही मागणी त्यांनी केली. तलाठी टेबलावर बसून शेतीचा सर्व्हे करतात, मग शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी मिळणार? त्यांच्यावर कोणाचा वचक नसल्याने ही परिस्थिती असल्याचे बन्सोड म्हणाले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याची मागणी त्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)