शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

कालव्याचा बोगदा तोडून सायपण रस्ता तयार करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

गोरेगाव : कटंगी मध्यम प्रकल्पातून गोरेगावच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी हिरडामाली ते पुनर्वसनटोली (गोरेगाव) रस्त्यावरील उजव्या कालव्यावर बोगदा तयार ...

गोरेगाव : कटंगी मध्यम प्रकल्पातून गोरेगावच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी हिरडामाली ते पुनर्वसनटोली (गोरेगाव) रस्त्यावरील उजव्या कालव्यावर बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यातून पाणी झिरपत असल्याने पाणी साचून राहते. त्यामुळे शेतकरी व इतरांना आवागमन करताना त्रास सहन करावा लागतो. कालवा बोगदा तोडून त्याऐवजी सायपन रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी चिंतामन बिसेन यांनी केली आहे.

उजव्या कालव्यातून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी वितरित करण्यात येते. हिरडामाली ते पुनर्वसन गावांसाठी या कालव्यावर बोगदा तयार करून रस्ता देण्यात आला आहे. या रस्त्यावर बोगदा करू नये, त्याऐवजी सायपन रस्ता करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले व बोगदा तयार केला. या बोगद्याची कामे निकृष्ट झाल्याने कालव्याचे पाणी सतत झिरपत असते. त्यामुळे या बोगद्याखाली पाणी साचलेले असते. पाणी साचवून राहत असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या बोगद्याची १० वर्षांपासून स्वच्छता करण्यात आली नाही. अनेकदा याकडे लक्ष वेधून समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. परंतु आश्वासनाशिवाय काहीही झाले नाही. हिरडामाली व गोरेगावच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे या बोेगद्याखालील रस्त्याच्या वापर शेतकरी करीत आहेत. या बोगद्याखालून दुचाकी वाहने चालविता येत नाही. पायी जाणेही शक्य नाही, त्यामुळे कालव्यावरील बोगदा तोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सायपण रस्त्याची गरज आहे.

हिरडामाली पुनर्वसन गाव, गोरेगावच्या शेतकऱ्यांनी आपली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी निवेदन देण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याने कृषी संघटनेचे अध्यक्ष चिंतामन बिसेन यांनी सायपण रस्त्याची मागणी उचलून धरली आहे.