शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

कालव्याचा बोगदा तोडून सायपण रस्ता तयार करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

गोरेगाव : कटंगी मध्यम प्रकल्पातून गोरेगावच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी हिरडामाली ते पुनर्वसनटोली (गोरेगाव) रस्त्यावरील उजव्या कालव्यावर बोगदा तयार ...

गोरेगाव : कटंगी मध्यम प्रकल्पातून गोरेगावच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी हिरडामाली ते पुनर्वसनटोली (गोरेगाव) रस्त्यावरील उजव्या कालव्यावर बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यातून पाणी झिरपत असल्याने पाणी साचून राहते. त्यामुळे शेतकरी व इतरांना आवागमन करताना त्रास सहन करावा लागतो. कालवा बोगदा तोडून त्याऐवजी सायपन रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी चिंतामन बिसेन यांनी केली आहे.

उजव्या कालव्यातून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी वितरित करण्यात येते. हिरडामाली ते पुनर्वसन गावांसाठी या कालव्यावर बोगदा तयार करून रस्ता देण्यात आला आहे. या रस्त्यावर बोगदा करू नये, त्याऐवजी सायपन रस्ता करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले व बोगदा तयार केला. या बोगद्याची कामे निकृष्ट झाल्याने कालव्याचे पाणी सतत झिरपत असते. त्यामुळे या बोगद्याखाली पाणी साचलेले असते. पाणी साचवून राहत असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या बोगद्याची १० वर्षांपासून स्वच्छता करण्यात आली नाही. अनेकदा याकडे लक्ष वेधून समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. परंतु आश्वासनाशिवाय काहीही झाले नाही. हिरडामाली व गोरेगावच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे या बोेगद्याखालील रस्त्याच्या वापर शेतकरी करीत आहेत. या बोगद्याखालून दुचाकी वाहने चालविता येत नाही. पायी जाणेही शक्य नाही, त्यामुळे कालव्यावरील बोगदा तोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सायपण रस्त्याची गरज आहे.

हिरडामाली पुनर्वसन गाव, गोरेगावच्या शेतकऱ्यांनी आपली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी निवेदन देण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याने कृषी संघटनेचे अध्यक्ष चिंतामन बिसेन यांनी सायपण रस्त्याची मागणी उचलून धरली आहे.