शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

कालव्याचा बोगदा तोडून सायपण रस्ता तयार करा()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

उजव्या कालव्यातून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी वितरित करण्यात येते. हिरडामाली ते पुनर्वसन गावांसाठी या कालव्यावर बोगदा तयार करून रस्ता ...

उजव्या कालव्यातून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी वितरित करण्यात येते. हिरडामाली ते पुनर्वसन गावांसाठी या कालव्यावर बोगदा तयार करून रस्ता देण्यात आला आहे. या रस्त्यावर बोगदा करु नये, त्याऐवजी सायपन रस्ता करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मामणीकडे दुर्लक्ष केले व बोगदा तयार केला. या बोगद्याची कामे निकृष्ठ झाल्याने कालव्याचे पाणी सतत झिरपत असते. त्यामुळे या बोगद्याखाली पाणी साचलेला असतो. पाणी साचवून राहत असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या बोगद्याची १० वर्षांपासून अनेकदा याकडे लक्ष वेधून समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. परंतु आश्वासनाशिवाय काहीही झाले नाही. हिरडामाली व गोरेगावच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे या बोेगद्याखालील रस्त्याच्या वापर शेतकरी करीत आहेत. या बोगद्याखालून दुचाकी वाहने चालविता येत नाही. पायी जाणेही शक्य नाही, त्यामुळे कालव्यावरील बोगदा तोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सायपण रस्त्याची गरज आहे.हिरडामाली पुनर्वसन गाव, गोरेगावच्या शेतककऱ्यांनी आपली मामणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी निवेदन देण्याचे ठरविले आहे.शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याने कृषी संघटनेचे अध्यक्ष चिंतामन बिसेन यांनी सायपण रस्त्याची मागणी उचलून धरली आहे.