शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

अनुदान लाटण्यासाठी बोगस विद्यार्थी भरती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST

भाग : १ संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्याच्या नावात अंशतः बदल करून त्याची दुसरी स्टुडंट आयडी तयार करण्याचा ...

भाग : १

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्याच्या नावात अंशतः बदल करून त्याची दुसरी स्टुडंट आयडी तयार करण्याचा गोरखधंदा तालुक्यात सुरू आहे. शाळेत प्रवेश दाखवून शासनाचे अनुदान लाटण्यासाठी हा खटाटोप केला जात असल्याचे निदर्शनास येते. शासनाने पट पडताळणी केल्यानंतर कायदा करूनही शक्कल लढवून अनुदान लाटण्याचा प्रकार सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिक्षण दानाचे पवित्र कार्य करणाऱ्या क्षेत्रात अशीही बनवाबनवी सुरू आहे. राज्यात आणखी अशा किती शाळा आहेत याची तपासणी करण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

भारतीय संविधानाच्या कलम २१ अ अंतर्गत ६ ते १४ वर्षे वयोगटांतील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र शासनाने हा कायदा २००९ मध्ये आणला. या कायद्यात सर्व खासगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पारदर्शक अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २० ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये ठरवून दिली आहेत. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या पोर्टलवरून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पहिल्या वर्गातील पटसंख्येच्या २५ टक्के विद्यार्थ्यांची निवड केली जाते. राज्य सरकारकडून निवड झालेल्या प्रती विद्यार्थ्यांमागे १७ हजार ६७० रुपये शाळांना अनुदान दिले जाते. पहिल्या वर्गात अधिकाधिक पटनोंदणी दर्शवून त्याच्या २५ टक्के विद्यार्थ्यांचे पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे. अगदी मोठ्या व नामांकित शाळांत विद्यार्थी प्रवेशासाठी कवायत करावी लागत असतानाच छोट्या शाळेत तोंडावर बोटे ठेवावीत एवढी विद्यार्थी पटसंख्या दिसून येत आहे. याचा आमच्या प्रतिनिधीने मागोवा घेतला असता अनेक आश्चर्यकारक तथ्य उघडकीस आले आहे.

स्थानिक सरस्वती शिशुमंदिर उच्च प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गातील स्टुडंट पोर्टलवर सात विद्यार्थ्यांचे नाव व आडनावात अंशतः बदल, तसेच जन्मतारखेत बदल करून एकाच नावाच्या दोन वेगवेगळ्या स्टुडंट आयडी तयार करण्यात आल्या आहेत. एकाच नावाचे दोन विद्यार्थी पहिल्या वर्गात या शाळेत नोंदणी झाले असल्याचे पोर्टलवर दिसून येत आहे. एकाच नावाच्या तीन स्टुडंट आयडी तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनीच्या नावाच्या जन्मतारीख वेगवेगळ्या व वडिलांच्या नावात अंशतः बदल दर्शविण्यात आला आहे. हा शाळेच्या स्टुडंट पोर्टलचा दोष की विद्यार्थ्याची बोगस भरती? हा प्रश्न कायम आहे. या शाळेच्या पोर्टलवर ६२ विद्यार्थी दिसून येत असले तरी प्रत्यक्ष हजेरीपटावर मात्र ४५ विद्यार्थीच असल्याचे दिसून येते.

..............

अबब जन्मतःच शाळेत प्रवेश

अबब....ऐकावे ते नवलच. जन्मतःच कुणी शाळेत प्रवेश घेत असल्याचे आपण ऐकले आहे का? नाही ना .... सरस्वती शिशु मंदिर उच्च प्राथमिक शाळेच्या पोर्टलवर दोन्ही विद्यार्थिनींचा जन्म २०१५ यावर्षी झाला आहे. या शाळेच्या पोर्टलवर नोंदणी असल्याचे दिसून येत आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे दोघींचाही स्टुडंट आयडी २०१५ या वर्षातील आहे. याचा अर्थ ज्यावर्षी यांचा जन्म झाला त्याच वर्षीची स्टुडंट आयडी कशी काय शक्य आहे?