शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सला काळ्या यादीत टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

गोंदिया : मागील खरीप हंगामातील धानाची उचल करुन भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करण्यात आला आहे. पण राईस मिलर्सकडून ...

गोंदिया : मागील खरीप हंगामातील धानाची उचल करुन भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करण्यात आला आहे. पण राईस मिलर्सकडून धानाची उचल करण्यास विलंब केला जात असल्याने रब्बी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे. त्यामुळे धानाची भरडाईसाठी उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याच्या सूृचना खा. सुनील मेंढे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केल्या.

जिल्ह्यातील विविध विषयांना घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी धान खरेदीचा आढावा घेतला. मागील खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ३० क्विंटल धानाची राईस मिलर्सने भरडाईसाठी अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदीची कोंडी वाढली असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढून धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळ परिसरातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या घरांची व्यवस्था लवकरात लवकर करण्यास सांगितले. ग्रामपंचायत, खंडविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर वेगाने हालचाली करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पणन अधिकारी पाटील, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, विमानतळ संचालक विनय ताम्रकार,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेश चौबे, माजी आमदार संजय पुराम, लोकसभा संघटन मंत्री बाळा अंजनकर, महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष किसान आघाडी संजय टेंभरे,गजेंद्र फुंडे, ओम कटरे होते.

.............

त्या ३० प्रभावित गावांवर लक्ष ठेवा

पावसाळ्याला सुरुवात झाली असून आगामी काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना संदर्भात आढावा घेण्यात आला. मागील वर्षी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील ३० पेक्षा अधिक गावे प्रभावित झाली होती. त्यामुळे यावेळी ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सज्ज राहून उपाययोजना करण्यास सांगितले.

..........

२१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस

कोरोना लसीकरणा संदर्भात यावेळी आढावा घेताना २१ जूनपासून सुरू होणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करावी. प्रत्येकाचे लसीकरण व्हावे यासाठी जनजागृती करावी. ४५ वर्षांवरील नागरिकसुद्धा लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे खा. मेंढे यांनी सांगितले.