शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सला काळ्या यादीत टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

गोंदिया : मागील खरीप हंगामातील धानाची उचल करुन भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करण्यात आला आहे. पण राईस मिलर्सकडून ...

गोंदिया : मागील खरीप हंगामातील धानाची उचल करुन भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करण्यात आला आहे. पण राईस मिलर्सकडून धानाची उचल करण्यास विलंब केला जात असल्याने रब्बी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे. त्यामुळे धानाची भरडाईसाठी उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याच्या सूृचना खा. सुनील मेंढे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केल्या.

जिल्ह्यातील विविध विषयांना घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी धान खरेदीचा आढावा घेतला. मागील खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ३० क्विंटल धानाची राईस मिलर्सने भरडाईसाठी अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदीची कोंडी वाढली असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढून धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळ परिसरातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या घरांची व्यवस्था लवकरात लवकर करण्यास सांगितले. ग्रामपंचायत, खंडविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर वेगाने हालचाली करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पणन अधिकारी पाटील, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, विमानतळ संचालक विनय ताम्रकार,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेश चौबे, माजी आमदार संजय पुराम, लोकसभा संघटन मंत्री बाळा अंजनकर, महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष किसान आघाडी संजय टेंभरे,गजेंद्र फुंडे, ओम कटरे होते.

.............

त्या ३० प्रभावित गावांवर लक्ष ठेवा

पावसाळ्याला सुरुवात झाली असून आगामी काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना संदर्भात आढावा घेण्यात आला. मागील वर्षी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील ३० पेक्षा अधिक गावे प्रभावित झाली होती. त्यामुळे यावेळी ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सज्ज राहून उपाययोजना करण्यास सांगितले.

..........

२१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस

कोरोना लसीकरणा संदर्भात यावेळी आढावा घेताना २१ जूनपासून सुरू होणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करावी. प्रत्येकाचे लसीकरण व्हावे यासाठी जनजागृती करावी. ४५ वर्षांवरील नागरिकसुद्धा लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे खा. मेंढे यांनी सांगितले.