शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सला काळ्या यादीत टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

गोंदिया : मागील खरीप हंगामातील धानाची उचल करुन भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करण्यात आला आहे. पण राईस मिलर्सकडून ...

गोंदिया : मागील खरीप हंगामातील धानाची उचल करुन भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करण्यात आला आहे. पण राईस मिलर्सकडून धानाची उचल करण्यास विलंब केला जात असल्याने रब्बी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे. त्यामुळे धानाची भरडाईसाठी उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याच्या सूृचना खा. सुनील मेंढे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केल्या.

जिल्ह्यातील विविध विषयांना घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी धान खरेदीचा आढावा घेतला. मागील खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ३० क्विंटल धानाची राईस मिलर्सने भरडाईसाठी अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदीची कोंडी वाढली असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढून धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळ परिसरातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या घरांची व्यवस्था लवकरात लवकर करण्यास सांगितले. ग्रामपंचायत, खंडविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर वेगाने हालचाली करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पणन अधिकारी पाटील, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, विमानतळ संचालक विनय ताम्रकार,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेश चौबे, माजी आमदार संजय पुराम, लोकसभा संघटन मंत्री बाळा अंजनकर, महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष किसान आघाडी संजय टेंभरे,गजेंद्र फुंडे, ओम कटरे होते.

.............

त्या ३० प्रभावित गावांवर लक्ष ठेवा

पावसाळ्याला सुरुवात झाली असून आगामी काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना संदर्भात आढावा घेण्यात आला. मागील वर्षी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील ३० पेक्षा अधिक गावे प्रभावित झाली होती. त्यामुळे यावेळी ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सज्ज राहून उपाययोजना करण्यास सांगितले.

..........

२१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस

कोरोना लसीकरणा संदर्भात यावेळी आढावा घेताना २१ जूनपासून सुरू होणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करावी. प्रत्येकाचे लसीकरण व्हावे यासाठी जनजागृती करावी. ४५ वर्षांवरील नागरिकसुद्धा लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे खा. मेंढे यांनी सांगितले.