शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोविड काळातही बिरसीवासीयांचे आंदोलन सुरूच ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील चार महिन्यांपासून सुरू असलेले बिरसीवासीयांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. सध्या कोविड काळ सुरू असूनही जिल्हा ...

गोंदिया : मागील चार महिन्यांपासून सुरू असलेले बिरसीवासीयांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. सध्या कोविड काळ सुरू असूनही जिल्हा व विमानतळ प्रशासनाने या आंदोलनाची अजूनही दखल घेतली नाही. त्यामुळे बिरसी येथील नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त आहे.

आपल्याला पुन्हा विमानतळ प्रशासनात कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी येथील एकूण बावीस सुरक्षारक्षक आपल्या कुटुंबासह जानेवारी महिन्यापासून विमानतळ गेटसमोर आंदोलन सुरू केले आहे. त्यातच आपले त्वरित पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी १०६ प्रकल्पग्रस्त कुटुंबही आंदोलनाला बसले आहेत. तसेच येथील अतिक्रमण ठरवून बेघर करण्यात आलेल्या एकूण ४० कुटुंबांनी स्थानिक ग्रामपंचायतीसमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या तीनही आंदोलनाला जवळपास चार महिन्यांचा काळ लोटला आहे. तरीही जिल्हा व विमानतळ प्रशासनाने एकही आंदोलनकर्त्यांच्या मागणीची पूर्तता केली नाही. ही तिन्ही आंदोलने विमानतळ प्रशासनाशी निगडित असूनही विमानतळ प्रशासनाने या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव बिरसी येथील नागरिकांना हे आंदोलन सुरू ठेवावे लागले आहे. सध्या सर्वत्र कोरोना या महामारीने थैमान घातले असून अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. या आंदोलनाला जिल्ह्यातील अनेक सामाजिक व राजकीय संघटना तसेच आमदार, खासदार यांनी भेटी देऊनही अजूनपर्यंत त्यांचा प्रश्न मार्गी न लावल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये रोष व्यक्त आहे.

कोरोना काळात तरी जिल्हा व विमानतळ प्रशासनाने या तिन्ही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.