शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

बिरसी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST

खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांचे मागील १५ वर्षांपासून अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष व्याप्त ...

खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांचे मागील १५ वर्षांपासून अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष व्याप्त असून, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारपासून बिरसी विमानतळाच्या गेटसमोर १०६ कुटुंबीयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. दरम्यान, या धरणे आंदोलनाला उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी भेट देऊन या महिन्याच्या अखेरपर्यंत अतिक्रमण काढून तीन चार महिन्यांत पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका आंदाेलकांनी घेतली आहे.

बिरसी येथील विमानतळासाठी २००६ मध्ये येथील जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, तसेच त्यांची घरेसुद्धा अधिग्रहित करण्यात आली. मात्र, त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. चार वर्षांपूर्वी बिरसी विमानतळ प्राधिकरणाने गोंदिया उपविभागीय कार्यालयाकडे प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन करण्यासाठी निधीसुद्धा जमा केला; पण यानंतरही या १०६ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. यासाठी या प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा आंदोलनसुद्धा केले. लोकप्रतिनिधींना पण निवेदन दिले; पण यानंतरही त्यांची समस्या मार्गी लागली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदोलन करण्याचा मार्ग पत्करला आहे. या प्रकल्पग्रस्तांची घरेसुद्धा पूर्णपणे जीर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे; पण याची अद्यापही जाणीव शासन आणि प्रशासनाला झाली नाही. त्यामुळेच त्यांनी आता आंदोलनास सुरुवात केली आहे. जोपर्यंत पुनर्वसनाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा निराय राय, शांती दत, बाळकृष्ण तावाडे, सुरेश तावाडे यांनी दिला आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अनिल खडतकर, नायब तहसीलदार सिंगाडेे, बिरसी विमानतळाचे संचालक विनय तांबरकार, सरपंद इंदू वंजारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.