शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST

खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांचे मागील १५ वर्षांपासून अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष व्याप्त ...

खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांचे मागील १५ वर्षांपासून अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष व्याप्त असून, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारपासून बिरसी विमानतळाच्या गेटसमोर १०६ कुटुंबीयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. दरम्यान, या धरणे आंदोलनाला उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी भेट देऊन या महिन्याच्या अखेरपर्यंत अतिक्रमण काढून तीन चार महिन्यांत पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका आंदाेलकांनी घेतली आहे.

बिरसी येथील विमानतळासाठी २००६ मध्ये येथील जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, तसेच त्यांची घरेसुद्धा अधिग्रहित करण्यात आली. मात्र, त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. चार वर्षांपूर्वी बिरसी विमानतळ प्राधिकरणाने गोंदिया उपविभागीय कार्यालयाकडे प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन करण्यासाठी निधीसुद्धा जमा केला; पण यानंतरही या १०६ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. यासाठी या प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा आंदोलनसुद्धा केले. लोकप्रतिनिधींना पण निवेदन दिले; पण यानंतरही त्यांची समस्या मार्गी लागली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदोलन करण्याचा मार्ग पत्करला आहे. या प्रकल्पग्रस्तांची घरेसुद्धा पूर्णपणे जीर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे; पण याची अद्यापही जाणीव शासन आणि प्रशासनाला झाली नाही. त्यामुळेच त्यांनी आता आंदोलनास सुरुवात केली आहे. जोपर्यंत पुनर्वसनाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा निराय राय, शांती दत, बाळकृष्ण तावाडे, सुरेश तावाडे यांनी दिला आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अनिल खडतकर, नायब तहसीलदार सिंगाडेे, बिरसी विमानतळाचे संचालक विनय तांबरकार, सरपंद इंदू वंजारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.