गोंदिया : आजघडीला सोशल मीडियावर तरुण मंडळी सक्रिय झाली आहे. आता ॲरेंज मॅरेज होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे ॲरेंज मॅरेजमुळे थाटलेला संसार सुखी आणि समाधानी होत असतो; परंतु प्रेमप्रकरणातून सुरू केलेला संसार किंवा ऑनलाइनमधून झालेल्या मित्रतेला सुखी संसारात वळविण्याचा प्रयत्न केला तरी तो बहुधा अपयशी ठरतो. ऑनलाइनमुळे जाेडीदार शोधताना मुलगा किंवा मुलगी ही पैसा, पद, प्रतिष्ठा पाहून जुळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पैसा पाहून जवळ येणारी व्यक्ती आपल्याला फसवून पळून जाईल हे खरे आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, टिव्टरवर दोस्ती करून त्यातून सुखी संसाराचे स्वप्न कुणी पाहात असेल तर ती व्यक्ती स्वत:ला खड्डयात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे असेच म्हणावे लागेल.
......................
ही घ्या काळजी
- ऑनलाइनवर जोडीदार शोधताना त्या व्यक्तीला आपण ओळखतो किंवा नाही याची खात्री करा.
- ज्या व्यक्तीशी मैत्री करतो ती व्यक्ती आपल्या संसारात आपल्याला साथ देईल किंवा नाही याची खात्री करावी.
- मित्रता करताना आपला व्यवसाय, नोकरी किंवा आपल्याला किती मिळकत आहे याची शहानिशा करणारा जोडीदार आपल्याशी प्रामाणिक राहू शकत नाही.
- दोस्ती केल्यावर पैशाचा हव्यास असलेली व्यक्ती आपल्यावर प्रेम करणार नाही तर ती आपल्या पैशावर प्रेम करते, त्यांचा स्वार्थ सिद्ध झाल्यास आपल्याला दूर करतील.
.....................
अशी होऊ शकते फसवणूक
१) ऑनलाइन आपल्याशी जवळील साधून मित्रता करतील. हळूहळू लग्नाच्या गोष्टी सुरू होतील. समोरच्या व्यक्तीच्या काय आवडी-निवडी करीत सरळ आपला स्वार्थ साधण्यासाठी श्रीमंत तरुणांच्या नादी लागून त्यांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा यशस्वी प्रयत्न करतात.
.....
२) आपल्या मिळकतीवरून आपल्याशी कुणी लग्न करण्याच्या गोष्टी करीत असेल तर सावध व्हा. ती व्यक्ती आपल्याला पाहून नाही तर आपला पैसा पाहून जवळ येत आहे. तो आपली कधीही फसवणूक करेल. यासाठी आपण सतर्क राहा.
.........................
कोट
ऑनलाइन जोडीदार शोधताना काळजी घ्यावी. कुणी व्यक्ती आपली फसवणूक तर करीत नाही ना याची शहानिशा करावी. पैशापायी आपल्यासोबत कुणी व्यक्ती जुळून आपल्यासोबत विवाहबंधन बांधण्याच्या गोष्टी करीत असेल तर त्याची स्वत: काळजी घ्यावी, अन्यथा तो आपली फसवणूक करू शकतो.
- वैशाली पाटील, सायबर सेल प्रमुख गोंदिया.