शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सावधान ! पोलीस पुन्हा उतरले मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:17 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याने पोलीस विभागाकडून मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध करण्यात येत असलेल्या दंडात्मक कारवाया बंद करण्यात आल्या ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याने पोलीस विभागाकडून मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध करण्यात येत असलेल्या दंडात्मक कारवाया बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा कोरोना डोके वर काढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यातच पोलीसही मैदानात उतरले असून, मास्क न लावणाऱ्यांंवर पुन्हा १०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. यामुळे आता मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या नक्कीच कमी होणार यात शंका नाही.

दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली व त्यानंतर नववर्षही चांगलेच लाभले. राज्यातच कोरोना नियंत्रणात आला होता व जिल्ह्यात मोजकेच बाधित आढळत असल्याने सर्व काही सुरळीत झाले होते. यात जिल्हावासीयांना कोरोनाचा विसर पडला होता व कोरोनाविषयक उपाययोजनांनाही बगल दिली जात होती. मात्र आता मागील आठवड्यापासून राज्यात पुन्हा कोरोना पाय पसरू लागला असून विदर्भातील काही तालुके हिटलिस्टवर आहेत. याची दखल घेत राज्य शासनाने पुन्हा काही निर्बंध लागू केले आहेत. विशेष म्हणजे, नागपूरमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला असून लगतच्या भंडारा जिल्ह्यातही कोरोना वाढत असल्याचे दिसत आहे. याकडे लक्ष देत जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी आदेश काढून पुन्हा काही निर्बंध लागू केले आहेत. यात त्यांनी मास्क लावण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.

यासाठीच आता पोलीस कर्मचारी पुन्हा मैदानात उतरले असून मास्क न लावता फिरणाऱ्यांवर १०० रुपये दंडाची कारवाई सुरू केली आहे. मध्यंतरी पोलीस चौकाचौकांत उभे राहून मास्क न लावणाऱ्यांना पकडत असल्याने दंडाच्या भीतीने नागरिक मास्क लावत होते. मात्र आता पोलिसांनीही कारवाया बंद केल्याने सर्वांनाच रान मोकळे झाले होते. विशेष म्हणजे, मास्क हेच कोरोना पसरू न देण्याचे प्रभावी शस्त्र आहे. मात्र त्यानंतरही नागरिक मास्क न लावता बिनधास्तपणे फिरू लागले होते. अशात नियंत्रणात असलेल्या आपल्या जिल्ह्यात अनिष्ट घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. करिता आता पोलिसांनी पुन्हा दंडात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. यामुळे आता मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, काही दिवसांत पुन्हा सर्वांच्या तोंडावर मास्क दिसणार, यात शंका नाही.

----------------------

आता ५०० रुपये दंड ठोठावण्याची गरज

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाही नागरिक बेजबाबदारपणे मास्क न लावता फिरत असल्याचे पाहून पालकमंत्र्यांनी अशांना थेट ५०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तब्बल ५०० रुपये खिशातून जाणार, या भीतीनेच सर्वांच्या तोंडावर तेव्हा मास्क चढले होते. मात्र सध्या कोरोना नियंत्रणात असल्याने पालकमंत्र्यांनी दंडाची रक्कम घटवून १०० रुपये करण्यास मंजुरी दिली होती. विशेष म्हणजे, सध्या सर्वांनीच आता खबरदारी घेण्याची गरज असून तसा इशाराही केंद्रीय समितीने दिला होता व त्याचे संकेत मिळू लागले आहेत. अशात आता मास्क न लावणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ५०० रुपये दंड ठोठावण्यात यावा, असे काही सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

------------------------------