शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

सावधान ! जिल्ह्यात सातत्याने होत आहे रुग्णवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST

गोंदिया : मोजक्या एका क्रियाशील रुग्णावर आलेल्या जिल्ह्यात आता पुन्हा सातत्याने रुग्णवाढ होताना दिसत आहे. हेच कारण आहे की, ...

गोंदिया : मोजक्या एका क्रियाशील रुग्णावर आलेल्या जिल्ह्यात आता पुन्हा सातत्याने रुग्णवाढ होताना दिसत आहे. हेच कारण आहे की, आता जिल्ह्यातील तीन तालुक्यांत कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून क्रियाशील रुग्णसंख्या ५ एवढी झाली आहे. हे धोक्याचे संकेत असल्याने जिल्हावासीयांनी अनर्थ टाळण्यासाठी खबरदारीने वागण्याची गरज दिसून येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट आली असता जिल्हावासीयांनी संयमाने घेतले व दुसरी लाट परतावून लावण्यात यश आले. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात होती व क्रियाशील रुग्णसंख्या मध्यंतरी एकावर आली होती. त्यानंतर मात्र कोरोना आता गेला या संभ्रमात नागरिकांनी कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. आता हेच कारण म्हणता येईल की, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रुग्ण आढळून येत असल्याने क्रियाशील रुग्णसंख्या वाढून आता ५ एवढी झाली आहे. पहिल्या लाटेचा जोर ओसरल्यावर नागरिकांनी कोरोना गेला या संभ्रमात राहून चांगलाच अतिरेक केला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्या लाटेने कहर केला व हा कहर पहिल्या लाटेपेक्षा जास्त होता. त्यात आता तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला जात असून खबरदारीने वागण्याबाबत सांगितले जात आहे. त्यात जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने हेच संकेत समजून नागरिकांनी आता पुन्हा जरा जपूनच वागण्याची गरज निर्माण झाली आहे.

-------------------------------

ग्रामीण भागात पुन्हा शिरकाव

आतापर्यंत आलेल्या दोन लाटांमध्ये गोंदिया तालुका हॉटस्पॉट होता व त्यातही गोंदिया शहराला कोरोनाने जास्त प्रमाणात झळ पोहोचविली आहे. मात्र, सध्या दिसून येत असलेल्या स्थितीत आमगाव, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात क्रियाशील रुग्ण दिसून येत आहेत. म्हणजेच, ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असल्याने यातून जिल्हावासीयांनी समजून घेण्याची गरज आहे.

----------------------------------

लसीकरण करवून घ्या

जिल्ह्यात लसीकरण जोमात सुरू असून असे असतानाही ग्रामीण भागात मात्र आजही नागरिक लसीकरणाला हुलकावणी देत असताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे आताच दिसून येत आहे. त्यामुळे शहरी असो वा ग्रामीण भाग प्रत्येकानेच लस घेऊन स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित करून घेण्याची गरज आहे.