शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सावधान! ९७ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

गोंदिया : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावातील पिण्याच्या पाणीसाठ्यातील पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले ...

गोंदिया : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावातील पिण्याच्या पाणीसाठ्यातील पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जातात. ८ पैकी २ तालुक्यांनी नमुनेच पाठविलेले नाहीत; परंतु ज्या सहा तालुक्यांतील २०१८ पाणी नमुने आले, त्यापैकी तब्बल ९७ नमुने दूषित आढळले आहेत. मे व जून महिन्यातील हा अहवाल जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून मिळाला आहे. यावरून पिण्याचे पाणीच आजाराचे कारण ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना उपाययोजनांमध्ये आरोग्य विभाग व्यस्त झाला. त्यामुळे पिण्याचे पाणी नमुने घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. नमुन्यांची संख्या तर घटली, शिवाय ज्यांनी पाठविले त्यांचा दूषित येण्याचा आकडाही मोठा आहे. गोंदिया जिल्ह्यात पाण्याचे स्रोत १३ हजार ६६१ आहेत. त्यापैकी २०१८ नमुने घेतले असून, त्यात ९७ दूषित आढळले आहेत. ज्या आरोग्य केंद्रांनी पाणी नमुने पाठविले नाहीत, अशा आरोग्य केंद्रांना पत्र देण्यात आले आहे.

.....................................................

ज्या गावात तपासणीच झाली नाही त्याचे काय?

१) गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व अर्जुनी-मोरगाव या दोन तालुक्यांतील एकाही गावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले नाहीत. त्या तालुक्यांनी कामात कुचराई केली आहे.

२) पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी कसलेही कारण न सांगता प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य साहाय्यकांनी गावात जाऊन पिण्याचे पाणी असलेल्या सार्वजनिक पाणीसाठ्यांचे नमुने प्रयोशाळेत पाठविणे बंधनकारक आहे.

३) आरोग्य साहाय्यक व इतर कर्मचारी कामात कुचराई करतात. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश गावांतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पोहोचलेच नाहीत.

........................

कोरोनामुळे नमुने घटले

- कोरोनामुळे पाणी नमुने घेण्याची संख्या घटली आहे. पाणी नमुने पाठविण्यास उशीर झाल्यास तत्काळ पत्र काढले जाते. तसेच दूषित पाणी नमुन्यांची माहिती मेलद्वारे कळवून उपाययोजना करण्यास सांगितले जात असल्याचे वरिष्ठ रासायनिक सहायक मुकेश त्रिपाठी यांनी सांगितले.

- कोरोनाच्या कामात आरोग्य विभाग मशगूल झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोरोनाच्या कामाच्या व्यापात पाण्याचे नमुने घेण्यातच आले नाहीत.

- कोरोनामुळे वरिष्ठ अधिकारी सतत कोणते ना कोणते काम आरोग्य सेवकांवर टाकत असल्याने पाण्याचे नमुने घेण्याच्या या नियमित कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

......................................

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

- साथरोग व जलजन्य आजारापासून बचावासाठी पाणी उकळून पिण्याची गरज आहे.

- पावसाचे पाणी कोठेही साचणार नाही याची काळजी घेऊन ते वाहते करावे.

- सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसताच तत्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन उपचार करून घ्यावेत.

- ज्या आरोग्य केंद्रांतर्गत गावातील पाणी नमुने गेले नाहीत त्यांना तत्काळ सूचना केल्या जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे म्हणाले.

......................

नमुने घेतले तपासणीसाठी - २०१८

नमुने आढळले दूषित - ९७

...................

- गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी १ जून २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येणार आहे.

- दूषित स्रोतांवर शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणी नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्याचे पत्र सर्व खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

........................

तालुकानिहाय आढावा

तालुका------- नमुने घेतले--- दूषित नमुने

गोंदिया---------६७६------------२२

तिरोडा-----------००-------------००

गोरेगाव----------५०१----------४६

आमगाव----------२२५--------००

देवरी--------------२६९---------१३

सालेकसा----------११६--------०९

सडक-अर्जुनी------२३१-------०७

अर्जुनी-मोरगाव-----००-------००