शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीला पालिकेची खीळ

By admin | Updated: September 29, 2015 03:14 IST

गोंदिया नगर परिषदेकडून दरवर्षी शहरातील संपत्तीधारकांच्या संपत्तीवर किती कर लावण्यात आला याबाबतच्या

गोंदिया : गोंदिया नगर परिषदेकडून दरवर्षी शहरातील संपत्तीधारकांच्या संपत्तीवर किती कर लावण्यात आला याबाबतच्या नोटीस दिल्या जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून सदर नोटीसच देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नगर परिषदेला किती कर द्यावयाचा आहे, हेच संपत्तीधारकांना ठाऊक नाही. तब्बल ९ कोटींपेक्षा जास्त कर थकबाकी वसूल करायची असताना पालिका प्रशासन साधी नोटीस बजावण्याकडेही दुर्लक्ष करीत असल्यामुळे या उदासीनतेमागे नेमका काय हेतू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नगर परिषदेच्या कर वसुली विभागाकडून दरवर्षी प्रत्येक संपत्तीधारकाला त्याच्या संपत्तीवर किती कर लावला जातो याची माहिती नोटीसच्या माध्यमाने दिली जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून अशी कोणतीही नोटीस शहरातील नागरिकांना नगर परिषदेकडून देण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नागरिकांवर कराच्या रूपात ९ कोटी ६३ लाख ४१ हजार ९९२ रूपये बाकी आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी गोंदिया नगर परिषदेच्या कर विभागाजवळ केवळ १२ कर्मचारी आहेत. मात्र गोंदिया शहरात ४० वॉर्ड आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला वसुलीसाठी दोन वार्ड देण्यात आले आहेत. आधी एक कर्मचारी एकाच वॉर्डात वसुली करीत होता. अशात कर्मचाऱ्यांचे काम वाढले आहे. त्याचा सरळ प्रभाव वसुलीवर पडत आहे.नगर परिषदेच्या कर विभागासाठी नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात न आल्यामुळे कमी कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागत आहे. संपत्ती कर जमा न होण्याच्या स्थितीत याचा प्रभाव शहरातील विकासावरसुद्धा पडत आहे. नगर परिषदेची कर वसुली विशेष अभियानाच्या माध्यमातूनच केली जाते. परंतु विशेष अभियानात अनेक समस्या असतात. मुख्याधिकाऱ्यांना घरोघरी जावे लागते. मागील मुख्याधिकारी सुमंत मोरे यांचे काम या बाबतीत गेल्यावर्षी उल्लेखनिय ठरले. त्यांना काही व्यापाऱ्यांचा रोषही पत्करावा लागला. पण त्यांनी वसुली केली. आता नवीन मुख्याधिकारी कर वसुलीचीही विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवितात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असणार आहे. (शहर प्रतिनिधी)किती झाली वसुली?सन २०१५-१६ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत ८७ लाख ९५ हजार ६०९ रूपयांची कर वसुली नगर परिषदेने केली. एप्रिल महिन्यात १६ लाख ६७५ रूपये, मे महिन्यात १६ लाख ४२ हजार २२९ रूपये, जून महिन्यात १५ लाख ५४ हजार ५९६ रूपये, जुलै महिन्यात १५ लाख ५४ हजार ५९६ रूपये व आॅगस्ट महिन्यात १८ लाख ९१ हजार १५९ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. वसुलीची हीच गती राहिली तर मोठ्या कठिणतेने दोन कोटी रूपयांची वसुली संपूर्ण वर्षभरात होवू शकेल. परंतु नगर परिषदेला कमीत कमी तीन ते चार कोटी रूपयांची वसुली करणे आवश्यक आहे.म्हणे नोटीस बनविणे सुरू आहे...!या संदर्भात कर वसुली विभागाला विचारणा केली असता, नोटीस बनविण्याचे काम सुरू आहे, असे उत्तर दिले जाते. शहरातील नागरिक सांगतात की, मागील एक-दीड वर्षापासून ते जेव्हा-जेव्हा कर वसुली विभागाशी संपर्क करतात तेव्हा -तेव्हा त्यांना नोटीस बनविण्याचे काम सुरू आहे, असेच सांगितले जाते. सदर प्रतिनिधीने जेव्हा कर विभागात चौकशी केली तेव्हासुद्धा हेच सांगण्यात आले. त्यामुळे या बाबतीत सदर विभाग किती गंभीर आहे आणि पालिका प्रशासनाचे त्यावर किती नियंत्रण आहे हे दिसून येत आहे.किती झाली वसुली?सन २०१५-१६ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत ८७ लाख ९५ हजार ६०९ रूपयांची कर वसुली नगर परिषदेने केली. एप्रिल महिन्यात १६ लाख ६७५ रूपये, मे महिन्यात १६ लाख ४२ हजार २२९ रूपये, जून महिन्यात १५ लाख ५४ हजार ५९६ रूपये, जुलै महिन्यात १५ लाख ५४ हजार ५९६ रूपये व आॅगस्ट महिन्यात १८ लाख ९१ हजार १५९ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. वसुलीची हीच गती राहिली तर मोठ्या कठिणतेने दोन कोटी रूपयांची वसुली संपूर्ण वर्षभरात होवू शकेल. परंतु नगर परिषदेला कमीत कमी तीन ते चार कोटी रूपयांची वसुली करणे आवश्यक आहे.म्हणे नोटीस बनविणे सुरू आहे...!या संदर्भात कर वसुली विभागाला विचारणा केली असता, नोटीस बनविण्याचे काम सुरू आहे, असे उत्तर दिले जाते. शहरातील नागरिक सांगतात की, मागील एक-दीड वर्षापासून ते जेव्हा-जेव्हा कर वसुली विभागाशी संपर्क करतात तेव्हा -तेव्हा त्यांना नोटीस बनविण्याचे काम सुरू आहे, असेच सांगितले जाते. सदर प्रतिनिधीने जेव्हा कर विभागात चौकशी केली तेव्हासुद्धा हेच सांगण्यात आले. त्यामुळे या बाबतीत सदर विभाग किती गंभीर आहे आणि पालिका प्रशासनाचे त्यावर किती नियंत्रण आहे हे दिसून येत आहे.