शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

५० हजार लोकांची नेहमी अपेक्षा भंग करणारी बँक()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नियमित ग्राहकांना एक पैसा जमा करण्याची आणि पैसे काढण्यापुरतीच सेवा मिळत असून, या कामासाठी सुद्धा तासनतास ...

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नियमित ग्राहकांना एक पैसा जमा करण्याची आणि पैसे काढण्यापुरतीच सेवा मिळत असून, या कामासाठी सुद्धा तासनतास रांगेत उभे रहावे लागते. कारण बँकेत येणारे कर्मचारी मर्जीने येतात आणि मर्जीने जातात. वेळेवर कोणी ग्राहक आला तरी कर्मचारी जसे म्हणेल तशी वाट बघावी लागते. तर बघता-बघता वेळ झाल्याचे सांगून पैसे जमा करणे किंवा काढण्यास मनाई केली जाते. अशात अनेक वेळा ग्राहकांना मोठा फटका बसतो.

कोणत्याही योजनेचा कसलाही लाभ नाही

शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना, पीक विमा योजना व विविध शेती उपयोगासाठी साहित्य खरेदीवर मिळणारे कर्ज या बँकेतून कधीच मिळत नाही. त्याचबरोबर शेळी, म्हैस, गाय व वराह पालनासाठी अनेक आदिवासी बेरोजगार युवक-युवती नेहमी बँकेच्या चकरा मारत असतात; परंतु त्यांना निराशा होऊन परत जावे लागे. केंद्र शासनाने बेरोजगार युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेला आज ६ वर्षे लोटले तरी या बँकेतून मुद्रा योजनेचा लाभ तालुक्यातील लोकांना मिळताना दिसत नाही. याशिवाय शासनाच्या अनेक योजना ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी बँकेमार्फत चालविल्या जातात; परंतु बँक ऑफ महाराष्ट्रात कोणत्याही योजनेला प्रदर्शित करणारे फलकसुद्धा लावले जात नाही. कोणी विचारणा केली, की त्याबद्दल कधीच समाधानकारक उत्तर मिळत नाही.