शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

पेरणीपूर्व कामाला लागला बळीराजा

By admin | Updated: May 19, 2014 23:38 IST

तीव्र ऊन तापत असतांनाही जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकासाठी पेरणीपूर्व कामाला लागला आहे. यंदा लवकर मानसून असल्याने शेतकर्‍यांची पेरणीपूर्व कामासाठी

गोंदिया : तीव्र ऊन तापत असतांनाही जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकासाठी पेरणीपूर्व कामाला लागला आहे. यंदा लवकर मानसून असल्याने शेतकर्‍यांची पेरणीपूर्व कामासाठी लगबग सुरु झाली आहे. खरीप हंगामासाठी पेरणी पुर्व कामाला वेग आलेला दिसत आहे. बळीराजा घराबाहेर पडून आपल्या शेतीच्या प्रारंभिक कामाला लागला आहे. काही शेतकरी शेतीवर शेणखत टाकत आहेत तर काही नवीन धान बियाणे विकत घेण्यासाठी फिरत आहेत. शेतीत दर्जेदार व भरघोष उत्पादन मिळावे हा प्रत्येक शेतकर्‍यांचे स्वप्न आहेत. काही शेतकरी संकरीत तर काही शेतकरी सुधारित धान बियाणे नवीन वाण खरेदी करण्यासाठी धावपड करू लागले आहेत. यंदा उन्हाळी धानपीक मोठ्याप्रमाणावर लावण्यात आले होते. त्यामुळे अनेक शेतकरी धान कापणी आणि मळणीच्या कामात व्यस्त आहेत. पाऊस पडण्यापूर्वी मळणी आटपून शेणखत टाकण्याच्या उद्देशाने लगबगीने दिवस रात्र कामात गुंतले आहेत. काही शेतकर्‍यांनी तर धान कापणी करण्यापूर्वीच वेळ काढून शेणखत टाकण्याचे काम आपल्या मळजमीनीत केला आहे. व आता मळणीच्या कामाला लागला आहे. मात्र तापमान जास्त असल्याने शेतकर्‍याचे मोठे हाल होत आहेत. भर उन्हात धान कापणे व भारे बांधून खड्यावर आणणे म्हणजे तारेवरची कसरत केल्या सारखे आहे. शेतीची कामे अशी असतात की ते वेळेवर करणे आवश्यक असतात. यासाठी उन पाऊस सर्व सारखा मानावे लागतो. यंदा ७ जूनला रात्रीपर्यंत मृग नक्षत्राची सुरूवात होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकात धानाचे मोठे उत्पादन घेत असल्याने या धानाला पोषक ठरणारे शेणखत शेतात टाकण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. जिल्ह्यातील काही भागात रबी पिके लावली होती. त्यामुळे अनेक शेतकरी रबी पिकाच्या चुरणी व मळणीच्या कामात व्यस्त आहेत. यंदा मान्सूनने हजेरी लावल्याची वार्ता कानी पडताच शेतकर्‍यांची कामासाठी लगबग सुरू झाली आहे. रबीचे पीक पाण्यात सापडू नये यासाठी शेतकर्‍यांचा आटापिटा सुरू आहे. यावर्षी पेरणीच्या कामाला योग्यवेळी सुरूवात करण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. सद्या स्थितीत उष्णतेचा त्रास असला तरी या उष्णतेला न जुमानता शेतकरी पेरणीपुर्व कामात व्यस्त आहेत. काही शेतकरी सायंकाळच्या वेळी शेतातील कुडा- कचरा आगीच्या स्वाधीन करताना दिसत आहेत. कधी पूर, कधी अवर्षण या निसर्गाच्या चक्रात आपले पिक अडकू नये यासाठी योग्यवेळी पेरण्याकरून खरीप पिक घेण्याच्या तयारीत शेतकरी असल्याचे चित्र दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)