शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेला नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:33 IST

आमगाव : नगर परिषदेतील आठ गावे आधीच विकास आराखड्यापासून वंचित आहेत. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येनुसार पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेत पाण्यासाठी ...

आमगाव : नगर परिषदेतील आठ गावे आधीच विकास आराखड्यापासून वंचित आहेत. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येनुसार पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेत पाण्यासाठी जनक्षोभ आहे. परंतु नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी न मिळाल्याने शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या नगर परिषद क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा योजनेचा विस्तार ही काळाची गरज आहे. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने भविष्यात पाणीपुरवठ्याची समस्या वाढेल याची जाणीव प्रशासनाला असताना जाणिवपूर्वक टाळण्यात येत आहे.

आमगाव आणि किडंगीपार ही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना त्याच्या भागाला पाणीपुरवठा करते. रिसामा, बिरसी, कुंभारटोली, पद्पूर, माल्ही ही गावे प्राधिकरणने केलेल्या बनगाव पाणीपुरवठा योजनेवर निर्भर आहे. आठ गावांच्या लोकसंख्येचा विचार करता उपलब्ध पाणीपुरवठा योजनवरील पाण्याची मागणी वाढली आहे. यात सद्यस्थितीत असलेली पाणीपुरवठा योजना ही अपुरी पडत आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला कळविले आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे भविष्यात पाणीपुरवठा योजनेसाठी समस्येची घंटा वाजू शकते. आमगाव व बनगावसाठी २ लाख ४० हजार लिटर, रिसामासाठी ३ लाख २० हजार लिटर, कुंभारटोलीसाठी ८५ हजार लिटर, माल्हीसाठी ४० हजार लिटर, पदमपूरसाठी १ लाख २० हजार लिटर तर किडंगीपारसाठी एक लाख लिटर पाणी दररोज लागते.

मात्र पाण्याची मागणी वाढल्याने त्याची पूर्तता करण्याकरिता अधिक पाण्याची गरज आहे. आज अनेक शहरांमध्ये नागरिक पाणीपुरवठ्याची वाट पाहत आहेत. पण पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनचा विस्तार वाढविला गेला नाही. परिणामी नगर परिषद परिसरातील आठ गावे पिण्याच्या पाण्यासाठी तळमळत आहेत. ही समस्या लोकप्रतिनिधी आणि सरकार सोडवतील का, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

-------------------------

रस्ता बांधकामाचा पाईपलाईनला तडाखा

आमगाव- देवरी व आमगाव-लांजी राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने कंत्राटदार कंपन्या मुजोरशाहीने वागत आहेत. महामार्गावरील बांधकाम नियोजनात स्थानिक पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती व नवीन बांधकाम असून सुद्धा या कंपन्या जाणिवपूर्वक या बांधकामात दिरंगाई करीत आहे. पाईपलाईनवर हातोडा घालून पुरवठा वारंवार खंडित करीत आहेत. तर नागरिकांना मिळत असलेले पाणी जमिनीत मुरत आहे.