शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

नगर परिषदेला नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:33 IST

आमगाव : नगर परिषदेतील आठ गावे आधीच विकास आराखड्यापासून वंचित आहेत. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येनुसार पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेत पाण्यासाठी ...

आमगाव : नगर परिषदेतील आठ गावे आधीच विकास आराखड्यापासून वंचित आहेत. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येनुसार पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेत पाण्यासाठी जनक्षोभ आहे. परंतु नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी न मिळाल्याने शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या नगर परिषद क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा योजनेचा विस्तार ही काळाची गरज आहे. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने भविष्यात पाणीपुरवठ्याची समस्या वाढेल याची जाणीव प्रशासनाला असताना जाणिवपूर्वक टाळण्यात येत आहे.

आमगाव आणि किडंगीपार ही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना त्याच्या भागाला पाणीपुरवठा करते. रिसामा, बिरसी, कुंभारटोली, पद्पूर, माल्ही ही गावे प्राधिकरणने केलेल्या बनगाव पाणीपुरवठा योजनेवर निर्भर आहे. आठ गावांच्या लोकसंख्येचा विचार करता उपलब्ध पाणीपुरवठा योजनवरील पाण्याची मागणी वाढली आहे. यात सद्यस्थितीत असलेली पाणीपुरवठा योजना ही अपुरी पडत आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला कळविले आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे भविष्यात पाणीपुरवठा योजनेसाठी समस्येची घंटा वाजू शकते. आमगाव व बनगावसाठी २ लाख ४० हजार लिटर, रिसामासाठी ३ लाख २० हजार लिटर, कुंभारटोलीसाठी ८५ हजार लिटर, माल्हीसाठी ४० हजार लिटर, पदमपूरसाठी १ लाख २० हजार लिटर तर किडंगीपारसाठी एक लाख लिटर पाणी दररोज लागते.

मात्र पाण्याची मागणी वाढल्याने त्याची पूर्तता करण्याकरिता अधिक पाण्याची गरज आहे. आज अनेक शहरांमध्ये नागरिक पाणीपुरवठ्याची वाट पाहत आहेत. पण पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनचा विस्तार वाढविला गेला नाही. परिणामी नगर परिषद परिसरातील आठ गावे पिण्याच्या पाण्यासाठी तळमळत आहेत. ही समस्या लोकप्रतिनिधी आणि सरकार सोडवतील का, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

-------------------------

रस्ता बांधकामाचा पाईपलाईनला तडाखा

आमगाव- देवरी व आमगाव-लांजी राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने कंत्राटदार कंपन्या मुजोरशाहीने वागत आहेत. महामार्गावरील बांधकाम नियोजनात स्थानिक पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती व नवीन बांधकाम असून सुद्धा या कंपन्या जाणिवपूर्वक या बांधकामात दिरंगाई करीत आहे. पाईपलाईनवर हातोडा घालून पुरवठा वारंवार खंडित करीत आहेत. तर नागरिकांना मिळत असलेले पाणी जमिनीत मुरत आहे.