शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वरूणराजाच्या आगमनाने शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा

By admin | Updated: June 19, 2016 01:36 IST

आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या जिल्हावासीयांना अखेर शुक्रवारी (दि.१७) दिलासा मिळाला. सायंकाकाळी आणि रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

सालेकसात सर्वाधिक : देवरी, तिरोड्यावर अवकृपा कायमगोंदिया : आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या जिल्हावासीयांना अखेर शुक्रवारी (दि.१७) दिलासा मिळाला. सायंकाकाळी आणि रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आठही तालुक्यांत वरुणराजाने हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी १३.७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे शेतीची कामे वेग धरणार असल्याचेही दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ््याने तसेच पाण्याच्या टंचाईने जिल्ह्यात कधी नव्हे ती परिस्थिती निर्माण झाली होती. ४५ डिग्रीच्यावर गेलेल्या उन्हाचा तडाखा सर्वांना होरपळून सोडणारा ठरला. यात जून महिना लागूनही पाऊस न बरसल्याने तापमान चाळीशीच्या वरच होते. त्यामुळे अंगाही लाहीलाही काही कमी झाली नव्हती. शिवाय जून अर्धा लोटूनही पाऊस बरसला नाही त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला होता. रबीने दगा दिला. त्यात आता खरिप हातून जाणार तर नाही ना, या चिंतेत ते अडकले होते. शुक्रवारी (दि.१७) वरूणदेव जिल्ह्यावर खुश झाले व त्यांनी आपली हजेरी लावली. दुपारी अचानकच पावसाने हजेरी लावून सर्वांना खूश करून टाकले. त्यानंतर रात्रीही पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या पावसाची नोंद घेण्यात आली असून या पावसामुळे सर्वांनाचा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे शेतकरी आता आपल्या कामासाठी लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शनिवारी सकाळीही शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे आता पाऊस नियमीत बरसणार असल्याचे वाटत होते. त्यानंतर मात्र दिवसभर पावसाने उघाड दिली. त्यामुळे पुन्हा उकाड्याने नागरिकांना हैरान व्हावे लागेल. अशात आता तरी बरसत राहा अशी प्रार्थना केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)