शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

धान खरेदीसाठी भाजपचा जिल्हाधिकार्‍यांना घेराव

By admin | Updated: May 19, 2014 23:43 IST

राज्य शासनाने ८ मे रोजी शासन निर्णय काढून आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

शासनाकडून त्वरित दखल : तीन दिवसात केंद्र सुरू न झाल्यास आंदोलन

गोंदिया : राज्य शासनाने ८ मे रोजी शासन निर्णय काढून आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा जिल्हा भाजपाने तीव्र निषेध करीत सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत जिल्हाधिकार्‍यांना घेराव केला. या आंदोलनाची शासनाने त्वरित दखल घेत २४ तासाच्या आत अहवाल मागविला आहे. येत्या तीन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेला असताना उन्हाळी धान पिकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आर्थिक गणित जुळवत होता. मात्र राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. राज्य शासनाच्या १७ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानुसार ३० जूनपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदीचे आदेश होते. परंतु ऐनवेळी आचारसंहितेदरम्यान ८ मे रोजी राज्य शासनाने धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले. सध्या जिल्ह्यात उन्हाळी धान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून येत्या आठ दिवसात हा हंगाम संपुष्टात येणार आहे. अशावेळी शेतकर्‍याला आधारभूत किंमत मिळणे आवश्यक असताना धान खरेदी केंद्राअभावी कवडीमोल भावात शेतकर्‍यांना हा धान खासगी व्यापार्‍यांना द्यावा लागत आहे. राज्य शासनाने निवडणूक आटोपताच आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचा अन्यायकारक घेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकर्‍यांचा छळ व व्यापार्‍यांना बळ देणार्‍या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी ुजिल्हाधिकार्‍यांच्या कक्षासमोर बसून ठिय्या देवून त्यांचा घेराव केला व धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली. भाजपची आक्रमकता भूमिका बघून जिल्हा प्रशासनाने ही बाब राज्याचे प्रधान सचिव दीपक कपूर यांना कळविली. स्वत: आ.राजकुमार बडोले व जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी कपूर यांच्याशी चर्चा केली. धान खरेदी केंद्र सुरू होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. या बाबीची शासनाने गंभीर दखल घेत तातडीने याबाबत निर्णय घेत फॅक्सद्वारे पत्र पाठविले. त्यानुसार २० मेपर्यंत जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठवायला सांगितले आहे. यावर निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी शासनाने आंदोलनावर भूमिका घेत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन देत असल्याचे पत्र पाठविल्याचे सांगितले. येत्या दिवसात जिल्हा प्रशासनाद्वारे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास प्रत्येक तालुकास्तरावर अधिकार्‍यांना घेराव करुन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्हा भाजपतर्फे देण्यात आला आहे. यादरम्यान जे व्यापारी कमी दरात धान खरेदी करतील त्यांच्यावर ईसीए अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर निर्देशही देण्यात आल्याचे कळते. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आ. राजकुमार बडोले, माजी आ.केशव मानकर, हेमंत पटले, दयाराम कापगते, खोमेश्वर रहांगडाले, भेरसिंह नागपुरे, प्रदेश सदस्य नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री विजय रहांगडाले, दीपक कदम, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, सभापती कुसन घासले, प्रकाश गहाणे, सविता पुराम, मोरेश्वर कटरे आदींनी केले. (शहर प्रतिनिधी)