शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीसाठी भाजपचा जिल्हाधिकार्‍यांना घेराव

By admin | Updated: May 19, 2014 23:43 IST

राज्य शासनाने ८ मे रोजी शासन निर्णय काढून आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

शासनाकडून त्वरित दखल : तीन दिवसात केंद्र सुरू न झाल्यास आंदोलन

गोंदिया : राज्य शासनाने ८ मे रोजी शासन निर्णय काढून आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा जिल्हा भाजपाने तीव्र निषेध करीत सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत जिल्हाधिकार्‍यांना घेराव केला. या आंदोलनाची शासनाने त्वरित दखल घेत २४ तासाच्या आत अहवाल मागविला आहे. येत्या तीन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेला असताना उन्हाळी धान पिकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आर्थिक गणित जुळवत होता. मात्र राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. राज्य शासनाच्या १७ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानुसार ३० जूनपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदीचे आदेश होते. परंतु ऐनवेळी आचारसंहितेदरम्यान ८ मे रोजी राज्य शासनाने धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले. सध्या जिल्ह्यात उन्हाळी धान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून येत्या आठ दिवसात हा हंगाम संपुष्टात येणार आहे. अशावेळी शेतकर्‍याला आधारभूत किंमत मिळणे आवश्यक असताना धान खरेदी केंद्राअभावी कवडीमोल भावात शेतकर्‍यांना हा धान खासगी व्यापार्‍यांना द्यावा लागत आहे. राज्य शासनाने निवडणूक आटोपताच आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचा अन्यायकारक घेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकर्‍यांचा छळ व व्यापार्‍यांना बळ देणार्‍या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी ुजिल्हाधिकार्‍यांच्या कक्षासमोर बसून ठिय्या देवून त्यांचा घेराव केला व धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली. भाजपची आक्रमकता भूमिका बघून जिल्हा प्रशासनाने ही बाब राज्याचे प्रधान सचिव दीपक कपूर यांना कळविली. स्वत: आ.राजकुमार बडोले व जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी कपूर यांच्याशी चर्चा केली. धान खरेदी केंद्र सुरू होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. या बाबीची शासनाने गंभीर दखल घेत तातडीने याबाबत निर्णय घेत फॅक्सद्वारे पत्र पाठविले. त्यानुसार २० मेपर्यंत जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठवायला सांगितले आहे. यावर निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी शासनाने आंदोलनावर भूमिका घेत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन देत असल्याचे पत्र पाठविल्याचे सांगितले. येत्या दिवसात जिल्हा प्रशासनाद्वारे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास प्रत्येक तालुकास्तरावर अधिकार्‍यांना घेराव करुन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्हा भाजपतर्फे देण्यात आला आहे. यादरम्यान जे व्यापारी कमी दरात धान खरेदी करतील त्यांच्यावर ईसीए अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर निर्देशही देण्यात आल्याचे कळते. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आ. राजकुमार बडोले, माजी आ.केशव मानकर, हेमंत पटले, दयाराम कापगते, खोमेश्वर रहांगडाले, भेरसिंह नागपुरे, प्रदेश सदस्य नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री विजय रहांगडाले, दीपक कदम, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, सभापती कुसन घासले, प्रकाश गहाणे, सविता पुराम, मोरेश्वर कटरे आदींनी केले. (शहर प्रतिनिधी)